शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दुपारी दीड वाजता मुंबईत असते दाट धुके!; रेल्वेचा जावईशोध, कर्जत पॅसेंजर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:12 IST

थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़

ठळक मुद्देकर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्दअनेकांना सहन करावा लागला़ मनस्ताप

पुणे : थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़ त्यामुळे मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला आहे़ पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते़ तेथून  ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते़ या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात़ पुणे-मुंबई दरम्यान घाट क्षेत्रात सकाळी दाट धुके असते़ त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्यांना उशीर होऊ शकतो़ हे एकवेळ मान्य केली तरी ११ वाजता निघणारी पॅसेंजर धुक्यामुळे कशी काय रद्द होऊ शकते़ याशिवाय ही गाडी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे़ १३ व १४ डिसेंबरलाही दाट धुके पडणार आहे, असे रेल्वे प्रशासनाला अगोदरच कसे काय माहिती पडले, असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे़ प्रवासी कमी असल्याचे कारण देऊन पुणे-लोणावळा दरम्यानची रात्रीची लोकल या अगोदरच रेल्वेने रद्द केली आहे़ आता धुक्याचे कारण देऊन पॅसेंजर रद्द केली आहे, त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे़पुणे-कर्जत-पुणे ही पॅसेंजर १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याची माहिती ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वेकडून जाहीर करण्यात आले़ त्यामुळे त्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचू शकली नाही़ त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ 

याबाबत पंकज ओसवाल यांनी सांगितले की, आपण कर्जत रेल्वे स्थानकावर फोन करुन विचारल्यावर त्यांनी याबाबत काहीही माहिती नाही़ कंट्रोलरला विचारुन सांगतो, असे सांगण्यात आले़ गाडी रद्द करण्याविषयी पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांना टष्ट्वीव करुन विचारणा केली़ तेव्हा त्यांनी धुक्यामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगितले़ हे कारण न पटण्यासारखे आहे़ कारण ही गाडी ११.१५ वाजता सुटते़ तेव्हा धुके असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे ओसवाल यांनी सांगितले़ 

टॅग्स :Karjatकर्जतRailway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे