शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दुपारी दीड वाजता मुंबईत असते दाट धुके!; रेल्वेचा जावईशोध, कर्जत पॅसेंजर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:12 IST

थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़

ठळक मुद्देकर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्दअनेकांना सहन करावा लागला़ मनस्ताप

पुणे : थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़ त्यामुळे मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला आहे़ पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते़ तेथून  ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते़ या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात़ पुणे-मुंबई दरम्यान घाट क्षेत्रात सकाळी दाट धुके असते़ त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्यांना उशीर होऊ शकतो़ हे एकवेळ मान्य केली तरी ११ वाजता निघणारी पॅसेंजर धुक्यामुळे कशी काय रद्द होऊ शकते़ याशिवाय ही गाडी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे़ १३ व १४ डिसेंबरलाही दाट धुके पडणार आहे, असे रेल्वे प्रशासनाला अगोदरच कसे काय माहिती पडले, असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे़ प्रवासी कमी असल्याचे कारण देऊन पुणे-लोणावळा दरम्यानची रात्रीची लोकल या अगोदरच रेल्वेने रद्द केली आहे़ आता धुक्याचे कारण देऊन पॅसेंजर रद्द केली आहे, त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे़पुणे-कर्जत-पुणे ही पॅसेंजर १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याची माहिती ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वेकडून जाहीर करण्यात आले़ त्यामुळे त्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचू शकली नाही़ त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ 

याबाबत पंकज ओसवाल यांनी सांगितले की, आपण कर्जत रेल्वे स्थानकावर फोन करुन विचारल्यावर त्यांनी याबाबत काहीही माहिती नाही़ कंट्रोलरला विचारुन सांगतो, असे सांगण्यात आले़ गाडी रद्द करण्याविषयी पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांना टष्ट्वीव करुन विचारणा केली़ तेव्हा त्यांनी धुक्यामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगितले़ हे कारण न पटण्यासारखे आहे़ कारण ही गाडी ११.१५ वाजता सुटते़ तेव्हा धुके असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे ओसवाल यांनी सांगितले़ 

टॅग्स :Karjatकर्जतRailway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे