शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र, महाविद्यालय स्तरावरील पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जातो. मात्र, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर किंवा दहावी, अकरावी, बारावी या तीन ही वर्गातील गुणांच्या आधारे निकाल प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.

------------------

इयत्ता बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, विधी, कृषी, डीएड आदी अभ्यासक्रमास कधी प्रवेश घेतात. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा असते. तसेच जेईई, जेईई ॲडव्हान्स आदी प्रवेश पूर्व परीक्षा देऊन आयआयटी सारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात.

------------------------

राज्य शासन व विद्यापीठ स्तरावर बारावीनंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान आदी सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी एकच सीईटी परीक्षा घ्यायला हवी. काही नामांकित महाविद्यालयांकडून स्वतंत्रपणे सीईटी घेतली जाते. यावर्षी अशा सीईटी परीक्षा घेणे शक्य होईल का? याबद्दल आताच सांगता येणार नाही.

- डॉ. प्रवीणसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

--------------

विद्यापीठांच्या सहकार्याने ऑनलाइन पद्धतीने बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार करता आला असता. पण आता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यापीठ स्तरावरून सर्व शाखांच्या अभ्यासक्रमासाठी संयुक्तपणे सीईटी परीक्षा घ्यावी लागेल. या परीक्षेच्या आधारेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.

- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

-----------------

राज्य शासनाकडून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर केला जातो, हे पाहावे लागेल. परंतु, बारावीनंतरच्या प्रवेशात पारदर्शकता असण्यासाठी सीईटी परीक्षेचा पर्याय योग्य ठरेल.

- तन्वी पवार, विद्यार्थी

------------

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करावे लागणार आहे. या गुणांवर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल.

- पल्लवी पवार, पालक

------

प्रत्येक महाविद्यालयाचे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने किंवा राज्य शासनाने कला, वाणिज्य ,विज्ञान आदी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे सीईटी परीक्षा द्यावी.

ईश्वरी पाटील, विद्यार्थी

-------

परीक्षा रद्द केल्यामुळे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. सीईटी परीक्षा घेतली जाणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचे निकाल पाहून बारावीचा निकाल जाहीर करावा. याच आधारे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश द्यावा.

- नंदा पाटील, पालक,