शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र, महाविद्यालय स्तरावरील पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जातो. मात्र, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर किंवा दहावी, अकरावी, बारावी या तीन ही वर्गातील गुणांच्या आधारे निकाल प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.

------------------

इयत्ता बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, विधी, कृषी, डीएड आदी अभ्यासक्रमास कधी प्रवेश घेतात. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा असते. तसेच जेईई, जेईई ॲडव्हान्स आदी प्रवेश पूर्व परीक्षा देऊन आयआयटी सारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात.

------------------------

राज्य शासन व विद्यापीठ स्तरावर बारावीनंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान आदी सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी एकच सीईटी परीक्षा घ्यायला हवी. काही नामांकित महाविद्यालयांकडून स्वतंत्रपणे सीईटी घेतली जाते. यावर्षी अशा सीईटी परीक्षा घेणे शक्य होईल का? याबद्दल आताच सांगता येणार नाही.

- डॉ. प्रवीणसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

--------------

विद्यापीठांच्या सहकार्याने ऑनलाइन पद्धतीने बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार करता आला असता. पण आता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यापीठ स्तरावरून सर्व शाखांच्या अभ्यासक्रमासाठी संयुक्तपणे सीईटी परीक्षा घ्यावी लागेल. या परीक्षेच्या आधारेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.

- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

-----------------

राज्य शासनाकडून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर केला जातो, हे पाहावे लागेल. परंतु, बारावीनंतरच्या प्रवेशात पारदर्शकता असण्यासाठी सीईटी परीक्षेचा पर्याय योग्य ठरेल.

- तन्वी पवार, विद्यार्थी

------------

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करावे लागणार आहे. या गुणांवर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल.

- पल्लवी पवार, पालक

------

प्रत्येक महाविद्यालयाचे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने किंवा राज्य शासनाने कला, वाणिज्य ,विज्ञान आदी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे सीईटी परीक्षा द्यावी.

ईश्वरी पाटील, विद्यार्थी

-------

परीक्षा रद्द केल्यामुळे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. सीईटी परीक्षा घेतली जाणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचे निकाल पाहून बारावीचा निकाल जाहीर करावा. याच आधारे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश द्यावा.

- नंदा पाटील, पालक,