शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बारावी परीक्षा रद्द; पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र, महाविद्यालय स्तरावरील पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जातो. मात्र, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर किंवा दहावी, अकरावी, बारावी या तीन ही वर्गातील गुणांच्या आधारे निकाल प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.

------------------

इयत्ता बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, विधी, कृषी, डीएड आदी अभ्यासक्रमास कधी प्रवेश घेतात. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा असते. तसेच जेईई, जेईई ॲडव्हान्स आदी प्रवेश पूर्व परीक्षा देऊन आयआयटी सारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात.

------------------------

राज्य शासन व विद्यापीठ स्तरावर बारावीनंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान आदी सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी एकच सीईटी परीक्षा घ्यायला हवी. काही नामांकित महाविद्यालयांकडून स्वतंत्रपणे सीईटी घेतली जाते. यावर्षी अशा सीईटी परीक्षा घेणे शक्य होईल का? याबद्दल आताच सांगता येणार नाही.

- डॉ. प्रवीणसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

--------------

विद्यापीठांच्या सहकार्याने ऑनलाइन पद्धतीने बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार करता आला असता. पण आता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यापीठ स्तरावरून सर्व शाखांच्या अभ्यासक्रमासाठी संयुक्तपणे सीईटी परीक्षा घ्यावी लागेल. या परीक्षेच्या आधारेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.

- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

-----------------

राज्य शासनाकडून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर केला जातो, हे पाहावे लागेल. परंतु, बारावीनंतरच्या प्रवेशात पारदर्शकता असण्यासाठी सीईटी परीक्षेचा पर्याय योग्य ठरेल.

- तन्वी पवार, विद्यार्थी

------------

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करावे लागणार आहे. या गुणांवर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल.

- पल्लवी पवार, पालक

------

प्रत्येक महाविद्यालयाचे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने किंवा राज्य शासनाने कला, वाणिज्य ,विज्ञान आदी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे सीईटी परीक्षा द्यावी.

ईश्वरी पाटील, विद्यार्थी

-------

परीक्षा रद्द केल्यामुळे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. सीईटी परीक्षा घेतली जाणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचे निकाल पाहून बारावीचा निकाल जाहीर करावा. याच आधारे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश द्यावा.

- नंदा पाटील, पालक,