शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘जलस्वराज्य’साठी १२२ गावे

By admin | Updated: October 19, 2015 01:57 IST

गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे.

भोर : गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील ग्रामीण भागात मागणी व लोकसहभाग तत्त्वावर जलस्वराज्य कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागाला गुणवत्तापूर्ण, शाश्वत व पुरेसे पाणी पुरवणे हा मुख्य हेतू आहे. राज्यातील ३३ पैकी १२ जिल्ह्यांत जलस्वराज्य २ हा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्यामार्फत याचे नियंत्रण ठेवले जाणार आहे. यात निमशहरी घटकांतर्गत १९, पाणीटंचाईग्रस्त घटकांतर्गत २८, पाणी गुणवत्ताबाधित घटकांतर्गत २३, भूजलस्तर जलधर व्यवस्थापन घटकांतर्गत ५२ अशी १२२ गावे वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)वाढते औद्योगिकीकरण, रासायनिक खतांचा अतिवापर, शेती वापरासाठी भूजलचा अतिउपसा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात विद्राव्य क्षार व फ्लोराइड आणि रासायनिक घटकांमुळे पाणी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. हे पाणी प्यायल्याने वाड्या-वस्त्यांवरील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून जलस्वराज्य २ अंतर्गत १२ जिल्ह्यांत गुणवत्ताबाधित गावांना स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावांत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जलधर व्यवस्थापनमधून आंबेगाव, इंदापूर, खेड, शिरूर, पुरंदर तालुक्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे गावांत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या लहान वाड्या-वस्त्यांमध्ये सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी भोर, आंबेगाव, मुळशी, जुन्नर, खेड, वेल्हे या तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावे निमशहरी घटकांतर्गत निवडण्यात आली आहेत. ज्या गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २५ हजारांपेक्षा कमी आहे. निमशहरी भाग, नगरपालिका नगर परिषद यांच्यालगत आहे, अशी जुन्नर, शिरूर, पुरंदर, इंदापूर व दौंड तालुक्यातील गावे यात आहेत. .