शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तलाठी परीक्षेत चुकले ११४ प्रश्न, उमेदवारांना मिळणार पूर्ण गुण; भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:25 IST

या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली...

पुणे : तलाठी भरती परीक्षेत प्रश्नसुचीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपांनुसार तब्बल ११४ प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले असून ३२ प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले आहेत. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

राज्यात ४ हजार ४४६ तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवार परीक्षेला बसले होते. अर्जांची संख्या जास्त असल्याने भूमी अभिलेख विभागाने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पहिला टप्पा १७ ते २२ ऑगस्ट, दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर तर तिसरा टप्पा ४ ते १४ सप्टेंबरमध्ये राबविण्यात आला. त्यासाठी परीक्षेची एकूण ५७ सत्रे घेण्यात आली.

उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप प्राप्त झाले. यापैकी ९ हजार ७२ आक्षेप मान्य करण्यात आल्याची माहिती नरके यांनी दिली. त्यात १४६ प्रश्नांचा समावेश होता. त्यातील ३२ प्रश्नांचे प्रश्नसुचीतील पर्याय बदलण्यात आले. तर ११४ प्रश्न किंवा उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नरके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पेसा क्षेत्रातील जागांबाबत अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आलेले नाहीत. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली असून अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसुचीही प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड