शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण विभाग अव्वल, नागपूर तळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 05:56 IST

१५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के

मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागातील ९८.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यात कोकण विभागाने अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.७३ टक्के, तर पुणे विभागाची टक्केवारी ९५.६४ टक्के आहे. नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के असा सर्वांत कमी निकाल लागला आहे.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीसाठी ६७ विषयांत आणि आठ माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली होती.

९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीवराज्यातील ९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यात मुंबई सर्वाधिक ६७, औरंगाबाद २५, नागपूर २ आणि पुणे १ यांचा समावेश आहे, तर ३ विद्यार्थी डिबार ठरले आहेत.

३३,३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटीयंदाच्या दहावीच्या परीक्षेत ८६ हजार ५९४ विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार असून, ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. पुनर्परीक्षार्थी जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले, तरच अकरावीचा अर्ज भरता येणार आहे. मात्र, एटीकेटी राहिलेले विद्यार्थी अकरावीचा अर्ज भरू शकतील

ठाण्याच्या गौतमीला मिळाले १०० टक्के गुण

ठाणे : ठाण्यातील गाैतमी संदीप सहस्रबुद्धे या विद्यार्थिनीने एसएससी बाेर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर नंबरी यश मिळवले आहे. गाैतमीने १०० टक्के गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले आहे. तिचे सर्वच स्तरांतून काैतुक करण्यात येत आहे. 

शहरातील बी केबिन परिसरातील ब्राह्मण सोसायटीत राहणारी गौतमी ही ए. के. जोशी शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’मधील विषयांत ४८८ आणि अभ्यासेतर उपक्रमातील १२, असे ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. गौतमीने शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. गौतमीला गायन आणि नृत्यकलेची आवड असून, गायन परीक्षेत तिला १२ गुण मिळाले आहेत. 

गौतमीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या पाच आणि कथ्थकच्या पाच परीक्षा दिल्या आहेत. अभ्यास आणि छंद यांची योग्य सांगड घालत तिने हे यश संपादन केले आहे. 

नववीपर्यंत अभ्यासाचे जे वेळापत्रक होते तेच दहावीसाठी कायम ठेवले होते, असे तिची आई गौरी यांनी सांगितले. आई- वडिलांबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे गाैतमी हिने सांगितले. दरम्यान, गौतमीची आई गौरी आणि वडील संदीप यांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहे. 

‘इंजिनीअर हाेण्याची इच्छा’विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून, भविष्यात इंजिनीअर होण्याची इच्छा आहे, असे गाैतमीने सांगितले. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती; पण १०० टक्के मिळतील, असे वाटले नव्हते, असेही ती म्हणाली.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालMaharashtraमहाराष्ट्र