शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:59 IST

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले.

- संजीव साबडे

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला. त्यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला.आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला यंदा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने तगडे आव्हान दिल्याची चर्चा आहे. तेथील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून खरे चित्र स्पष्ट होईलच, पण चंद्राबाबू व त्यांच्या पक्षाच्या झालेल्या लोकप्रियतेचा फायदा मिळवू शकणारा आंध्रात सध्या एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे वायएसआर काँग्रेस. आजही वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार आहे. गेल्या लोकसभेत आठ सदस्य होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास मोदी सरकार तयार नसल्याच्या निषेधार्थ या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत.एके काळी बालेकिल्ला असलेल्या आंध्रातील सत्ता काँग्रेसने स्वत:च्या कारवायांमुळे घालवली. ती गेली तेलगू देसमकडे, पण वायएस राजशेखर रेड्डी यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात कर्तृत्ववान नेता मिळाला आणि त्यामुळे राज्याची सत्ताही पुन्हा मिळवता आली. वायएसआर आंध्रचे मुख्यमंत्री झाले. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. ते अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात.पण २00९ साली त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने राज्यातील १२२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला. वायएसआर यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला, पण दिल्लीतील नेत्यांची त्यास तयारी नव्हती. आत्महत्या केलेल्या लोकांच्या कुुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी जगन मोहन यांनी यात्रा काढली. काँग्रेसने के. रोसय्या यांच्याकडे मुख्यमंत्री दिले, जगन मोहन यांच्या काकांना मंत्रिमंडळात घेतले. अंजय्या यांचा अपमान हा जसा काँग्रेसचा चुकीचा निर्णय होता, तसेच यंदाही झाले. लोकप्रिय नेत्याच्या मुलाला डावलल्याची भावना राज्यात निर्माण झाली. काँग्रेसचे अनेक नेते व आमदारही जगन मोहन यांच्या बाजूला गेले. त्या सर्वांनी मिळून २0११ साली वायएसआर काँग्रेसची स्थापना केली.आता तेलंगणाप्रमाणे आंध्र प्रदेशातही काँग्रेसची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस असाच सामना आहे. वायएसआर काँग्रेसची स्वत:ची अशी विचारसरणी नाही. तेलगू भाषिक व राज्याची अस्मिता यांचे हित एवढाच पक्षाचा अजेंडा आहे. जगन मोहन काँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला. वायएसआर अतिशय लोकप्रिय नेते होते, हे खरे असले, तरी त्यांनी सत्तेत असताना प्रचंड माया निर्माण केली होती. ती आपल्याकडे ठेवण्याचा जगन मोहन रेड्डी यांचा प्रयत्न होता. या रकमेचा हिशेब देणेही शक्य नव्हते. या साऱ्या प्रकरणांत त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. तरीही प्रकरणांचा निकाल लागायचाच आहे.अर्थात, त्यामुळे जगन मोहन रेड्डी खचले नाहीत. बाहेर आल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले. गेल्या विधानसभा निवडणुकांत नवा पक्ष व चौकशांचा ससेमिरा यांमुळे ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण ते बळ आपल्यात आहे, असे त्यांनी दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला, पण आतापर्यंतचे जगन मोहन यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना, चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला आहे. वायएसआर काँग्रेस वा जगन मोहन रेड्डी यांची काँग्रेसशी असलेली नाळ अद्याप तुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते प्रसंगी काँग्रेसशी समझोता करू शकतात. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे, पण काँग्रेसने आतापर्यंत आंध्रात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी.चंद्राबाबू नायडू यांची लोकप्रियता कमी होत आहे, आंध्र प्रदेशामध्ये प्रस्थापितांविरुद्ध खूप नाराजी आहे, असे बोलले जाते, पण काँग्रेस वा भाजप त्या बाबींचा फायदा उठवू शकत नाही. तशी ताकद असलीच, तरी ती केवळ वायएसआर काँग्रेस व जगन मोहन रेड्डी यांच्यातच आहे. यंदा राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होणार आहेत. काही मतदारसंघात मतदान झालेलेच आहे. चौरंगी लढतीत काय होईल, हे सांगणे अवघड असते. त्यामुळे वायएसआर काँग्रेसची यंदा राज्यात परीक्षाच आहे. या परीक्षेत ते बाजी मारतात की चंद्राबाबूंचा क्रमांक कसाबसा का होईना, पहिला राहतो, हे पाहायला मिळेल.उद्याच्या अंकात ।बंगाली दीदींचा तृणमूल काँग्रेस

टॅग्स :Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक