शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:59 IST

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले.

- संजीव साबडे

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला. त्यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला.आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला यंदा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने तगडे आव्हान दिल्याची चर्चा आहे. तेथील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून खरे चित्र स्पष्ट होईलच, पण चंद्राबाबू व त्यांच्या पक्षाच्या झालेल्या लोकप्रियतेचा फायदा मिळवू शकणारा आंध्रात सध्या एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे वायएसआर काँग्रेस. आजही वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार आहे. गेल्या लोकसभेत आठ सदस्य होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास मोदी सरकार तयार नसल्याच्या निषेधार्थ या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत.एके काळी बालेकिल्ला असलेल्या आंध्रातील सत्ता काँग्रेसने स्वत:च्या कारवायांमुळे घालवली. ती गेली तेलगू देसमकडे, पण वायएस राजशेखर रेड्डी यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात कर्तृत्ववान नेता मिळाला आणि त्यामुळे राज्याची सत्ताही पुन्हा मिळवता आली. वायएसआर आंध्रचे मुख्यमंत्री झाले. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. ते अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात.पण २00९ साली त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने राज्यातील १२२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला. वायएसआर यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला, पण दिल्लीतील नेत्यांची त्यास तयारी नव्हती. आत्महत्या केलेल्या लोकांच्या कुुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी जगन मोहन यांनी यात्रा काढली. काँग्रेसने के. रोसय्या यांच्याकडे मुख्यमंत्री दिले, जगन मोहन यांच्या काकांना मंत्रिमंडळात घेतले. अंजय्या यांचा अपमान हा जसा काँग्रेसचा चुकीचा निर्णय होता, तसेच यंदाही झाले. लोकप्रिय नेत्याच्या मुलाला डावलल्याची भावना राज्यात निर्माण झाली. काँग्रेसचे अनेक नेते व आमदारही जगन मोहन यांच्या बाजूला गेले. त्या सर्वांनी मिळून २0११ साली वायएसआर काँग्रेसची स्थापना केली.आता तेलंगणाप्रमाणे आंध्र प्रदेशातही काँग्रेसची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस असाच सामना आहे. वायएसआर काँग्रेसची स्वत:ची अशी विचारसरणी नाही. तेलगू भाषिक व राज्याची अस्मिता यांचे हित एवढाच पक्षाचा अजेंडा आहे. जगन मोहन काँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला. वायएसआर अतिशय लोकप्रिय नेते होते, हे खरे असले, तरी त्यांनी सत्तेत असताना प्रचंड माया निर्माण केली होती. ती आपल्याकडे ठेवण्याचा जगन मोहन रेड्डी यांचा प्रयत्न होता. या रकमेचा हिशेब देणेही शक्य नव्हते. या साऱ्या प्रकरणांत त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. तरीही प्रकरणांचा निकाल लागायचाच आहे.अर्थात, त्यामुळे जगन मोहन रेड्डी खचले नाहीत. बाहेर आल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले. गेल्या विधानसभा निवडणुकांत नवा पक्ष व चौकशांचा ससेमिरा यांमुळे ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण ते बळ आपल्यात आहे, असे त्यांनी दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला, पण आतापर्यंतचे जगन मोहन यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना, चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला आहे. वायएसआर काँग्रेस वा जगन मोहन रेड्डी यांची काँग्रेसशी असलेली नाळ अद्याप तुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते प्रसंगी काँग्रेसशी समझोता करू शकतात. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे, पण काँग्रेसने आतापर्यंत आंध्रात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी.चंद्राबाबू नायडू यांची लोकप्रियता कमी होत आहे, आंध्र प्रदेशामध्ये प्रस्थापितांविरुद्ध खूप नाराजी आहे, असे बोलले जाते, पण काँग्रेस वा भाजप त्या बाबींचा फायदा उठवू शकत नाही. तशी ताकद असलीच, तरी ती केवळ वायएसआर काँग्रेस व जगन मोहन रेड्डी यांच्यातच आहे. यंदा राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होणार आहेत. काही मतदारसंघात मतदान झालेलेच आहे. चौरंगी लढतीत काय होईल, हे सांगणे अवघड असते. त्यामुळे वायएसआर काँग्रेसची यंदा राज्यात परीक्षाच आहे. या परीक्षेत ते बाजी मारतात की चंद्राबाबूंचा क्रमांक कसाबसा का होईना, पहिला राहतो, हे पाहायला मिळेल.उद्याच्या अंकात ।बंगाली दीदींचा तृणमूल काँग्रेस

टॅग्स :Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक