शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेशात परीक्षाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:59 IST

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले.

- संजीव साबडे

जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकांत आपले बळ दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला. त्यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला.आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला यंदा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने तगडे आव्हान दिल्याची चर्चा आहे. तेथील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून खरे चित्र स्पष्ट होईलच, पण चंद्राबाबू व त्यांच्या पक्षाच्या झालेल्या लोकप्रियतेचा फायदा मिळवू शकणारा आंध्रात सध्या एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे वायएसआर काँग्रेस. आजही वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार आहे. गेल्या लोकसभेत आठ सदस्य होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास मोदी सरकार तयार नसल्याच्या निषेधार्थ या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत.एके काळी बालेकिल्ला असलेल्या आंध्रातील सत्ता काँग्रेसने स्वत:च्या कारवायांमुळे घालवली. ती गेली तेलगू देसमकडे, पण वायएस राजशेखर रेड्डी यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात कर्तृत्ववान नेता मिळाला आणि त्यामुळे राज्याची सत्ताही पुन्हा मिळवता आली. वायएसआर आंध्रचे मुख्यमंत्री झाले. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. ते अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात.पण २00९ साली त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने राज्यातील १२२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला. वायएसआर यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला, पण दिल्लीतील नेत्यांची त्यास तयारी नव्हती. आत्महत्या केलेल्या लोकांच्या कुुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी जगन मोहन यांनी यात्रा काढली. काँग्रेसने के. रोसय्या यांच्याकडे मुख्यमंत्री दिले, जगन मोहन यांच्या काकांना मंत्रिमंडळात घेतले. अंजय्या यांचा अपमान हा जसा काँग्रेसचा चुकीचा निर्णय होता, तसेच यंदाही झाले. लोकप्रिय नेत्याच्या मुलाला डावलल्याची भावना राज्यात निर्माण झाली. काँग्रेसचे अनेक नेते व आमदारही जगन मोहन यांच्या बाजूला गेले. त्या सर्वांनी मिळून २0११ साली वायएसआर काँग्रेसची स्थापना केली.आता तेलंगणाप्रमाणे आंध्र प्रदेशातही काँग्रेसची फारशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस असाच सामना आहे. वायएसआर काँग्रेसची स्वत:ची अशी विचारसरणी नाही. तेलगू भाषिक व राज्याची अस्मिता यांचे हित एवढाच पक्षाचा अजेंडा आहे. जगन मोहन काँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला. वायएसआर अतिशय लोकप्रिय नेते होते, हे खरे असले, तरी त्यांनी सत्तेत असताना प्रचंड माया निर्माण केली होती. ती आपल्याकडे ठेवण्याचा जगन मोहन रेड्डी यांचा प्रयत्न होता. या रकमेचा हिशेब देणेही शक्य नव्हते. या साऱ्या प्रकरणांत त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. तरीही प्रकरणांचा निकाल लागायचाच आहे.अर्थात, त्यामुळे जगन मोहन रेड्डी खचले नाहीत. बाहेर आल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले. गेल्या विधानसभा निवडणुकांत नवा पक्ष व चौकशांचा ससेमिरा यांमुळे ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण ते बळ आपल्यात आहे, असे त्यांनी दाखवून दिले. ते भाजपला मदत करतात, असा आरोप चंद्राबाबू यांनी अनेकदा केला, पण आतापर्यंतचे जगन मोहन यांचे राजकारण भाजपला मदत करणारे दिसलेले नाही. किंबहुना, चंद्राबाबूंनीच अनेकदा भाजपशी युती वा समझोता केला आहे. वायएसआर काँग्रेस वा जगन मोहन रेड्डी यांची काँग्रेसशी असलेली नाळ अद्याप तुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते प्रसंगी काँग्रेसशी समझोता करू शकतात. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे, पण काँग्रेसने आतापर्यंत आंध्रात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी.चंद्राबाबू नायडू यांची लोकप्रियता कमी होत आहे, आंध्र प्रदेशामध्ये प्रस्थापितांविरुद्ध खूप नाराजी आहे, असे बोलले जाते, पण काँग्रेस वा भाजप त्या बाबींचा फायदा उठवू शकत नाही. तशी ताकद असलीच, तरी ती केवळ वायएसआर काँग्रेस व जगन मोहन रेड्डी यांच्यातच आहे. यंदा राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होणार आहेत. काही मतदारसंघात मतदान झालेलेच आहे. चौरंगी लढतीत काय होईल, हे सांगणे अवघड असते. त्यामुळे वायएसआर काँग्रेसची यंदा राज्यात परीक्षाच आहे. या परीक्षेत ते बाजी मारतात की चंद्राबाबूंचा क्रमांक कसाबसा का होईना, पहिला राहतो, हे पाहायला मिळेल.उद्याच्या अंकात ।बंगाली दीदींचा तृणमूल काँग्रेस

टॅग्स :Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक