शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

यादव-मुस्लिमांचे मसिहा - मुलायम सिंह यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:59 AM

जातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही.

- संजीव साबडेजातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही. ते कायम भाजपच्या विरोधात राहिले आणि १९९0 साली अयोध्येत जमलेल्या कारसेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांच्यावर हिंदूविरोधी व मुस्लिमांचे तारणहार असे शिक्केही बसले.भारतात उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल यांचे एकत्र येणे, याचा अर्थ यादव, मुस्लीम, दलित, वाल्मीकी व जाट यांनी एकत्र येण्यासारखे मानले जाते. समाजवादी पक्षाची सारी सूत्रे आता अखिलेश यादव यांच्याकडे असली तरी त्या पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आहेत. उत्तर प्रदेशातील यादव व मुस्लीम यांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. राज्यात यादव समाज ९ टक्के व मुस्लीम समाज १९.३ टक्के आहे. म्हणजे सुमारे २८ टक्के मतांच्या आधारे ते आतापर्यंत निवडणुका लढवत राहिले. पण त्याशिवाय त्यांना यादव वगळता ३५ टक्के ओबीसींचाही पाठिेंबा मिळत राहिला. त्यामुळे त्यांनी तीनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आणि केंद्रात संरक्षणमंत्री म्हणूनही काही काळ काम केले. त्यांचे पुत्र अखिलेशही सलग पाच वर्षे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी राहिले.नावाने मुलायम असलेला हा नेता आता सुमारे ८0 वर्षांचा असला आणि पक्षाची सारी सूत्रे मुलाकडे गेली असली तरी तो एके काळी अतिशय कणखर नेता म्हणून ओळखला जात असे. डॉ. राम मनोहर लोहिया व १९७७ साली इंदिरा गांधी यांना पराभूत करणारे राज नारायण या समाजवादी नेत्यांच्या व नंतर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पठडीत तयार झालेल्या मुलायम यांनी कायमच राज्यात ओबीसी व यादव यांचे राजकारण केले. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण, उच्च जाती व मुस्लीम (एकूण मते ३५ टक्के) यांच्या मतांच्या आधारे उत्तर प्रदेशची व देशाची सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसकडून त्यांनी मुस्लिमांना आपल्याकडे खेचले आणि त्यातूनच त्यांनी राज्यात दबदबा निर्माण केला.जातींच्या आधारे राज्यात राजकारण करणारे मुलायम सिंह यादव यांनी धर्मनिरपेक्षतेशी मात्र तडजोड केली नाही. ते कायम भाजपच्या विरोधात राहिले आणि १९९0 साली अयोध्येत जमलेल्या कारसेवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांच्यावर हिंदूविरोधी व मुस्लिमांचे तारणहार असे शिक्केही बसले. पण त्याला उत्तर न देता, ते आपले काम करीत राहिले. कमंडल (भाजपचे हिंदू राजकारण) विरुद्ध मंडल (मंडल आयोग) मध्ये ते मंडलच्या बाजूनेच राहिले. पण त्यांना उत्तर प्रदेशाबाहेर कधीच आपले स्थान निर्माण करता आले नाही. त्यामुळे ते आणि त्यांनी १९९१ साली स्थापन केलेला समाजवादी पक्ष हे प्रादेशिक नेते व पक्ष बनून राहिले.पण सर्व प्रादेशिक पक्षांप्रमाणेच समाजवादी पक्षही यादव घराण्याचा पक्ष बनला. त्यांचे दोन्ही बंधू राम गोपाल यादव व शिवपाल यादव पक्षाचे सरचिटणीस बनले. शिवपाल यांचे अखिलेशशी न पटल्याने त्यांनी आता प्रगतीशील समाजवादी पक्ष स्थापन केला आहे. मुलायम यांचा मुलगा अखिलेश, त्याची पत्नी डिंपल हेही पक्षाचे नेते बनले. लालुप्रसाद व मुलायम दोघेही यादवांचे नेते आणि दोघांनीही पक्ष व सत्ता घरातील मंडळींकडेच सोपवली आहे.पण २0१४ च्या मोदी लाटेत मुलायम सिंहांची ओबीसी व्होट बँक फुटली. ती भाजपकडे गेली. मायावती यांची बसपची दलित व्होट बँकही फुटून भाजपकडे गेली. अजित सिंह यांची जाट व्होट बँकही रालोदकडून भाजपच्या खिशात गेली. थोडक्यात भाजपने मोदी लाटेत उत्तर प्रदेशच्या दलित, ओबीसी व्होट बँका फोडल्या. मुस्लिमांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष व काँग्रेस यांना मते दिली. पण त्याआधारे यापैकी कोणत्याच पक्षाला मोठा विजय मिळवणे शक्य नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांतही झाली.त्यामुळे जाट, दलित, वाल्मीकी, यादव व ओबीसी, मुस्लीम (सप, बसप, रालोद, काँग्रेस) यांनी एकत्र येऊ न २0१८ साली पोटनिवडणुका लढवल्या आणि भाजपला पराभूतही केले. त्यामुळेच आता भाजपच्या विरोधात काँग्रेस वगळता हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. निवडणुकांचे निकाल काय लागतात, यावर मुलायम सिंह यांची व्होट बँक शाबूत आहे का, हे स्पष्ट होईल. ते अद्याप यादव व मुस्लिमांचे मसिहा आहेत का, हे निकालांतून समजेलउद्याच्या अंकात : महाराष्ट्रवादी गोयंकारांचा पक्ष

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019