शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 17:11 IST

Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले.

ठळक मुद्देसरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ नये. घ्यायचाच असेल, तर आधी गरिबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

यवतमाळ : आम्ही राज्य सरकारमध्ये सामील असलो, तरी जनहिताच्या मुद्द्यावर आंदोलन करू. शिक्षण क्षेत्रात दिल्ली सरकारने खूप सुधारणा केली. पाणी, वीज बिलही माफ केले. मोहोल्ला क्लिनिकमधून दिल्लीच्या लोकांना दिलासा मिळाला. दिल्ली सरकार या सुधारणा करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल आमदार अबू असीम आझमी यांनी उपस्थित केला. ("work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned)

ते यवतमाळ येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, मंत्र्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हाच परमबीर सिंग यांनी शरद पवारांना माहिती का दिली नाही? आता बदली झाल्यावर ते का बोलत आहेत? सचिन वाझेंसारखा छोटा अधिकारी वरिष्ठांची मंजुरी असल्याशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. या प्रकरणात चौकशी होत आहे. त्यापूर्वीच गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. त्यांनी तो सध्याच देऊही नये. आम्ही सोबत राहिलो म्हणून सरकार राहील अन् आम्ही विरोधात गेलो म्हणून सरकार पडणारही नाही. परंतु, राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल.

केंद्राच्या कारभाराबाबत आझमी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अंबानी आणि अदानींसाठी काम करीत आहेत. हम दो हमारे दो हीच त्यांची नीती आहे. त्यांनी देश आर्थिकदृष्ट्या बरबाद केला आहे. १५ टक्के मुस्लीमांकडे बोट दाखवून ८५ टक्के हिंदूंना घाबरविले जात आहे. मात्र रेल्वेचे खासगीकरण झाल्यास नुकसान मुस्लीमांचे अधिक होणार की हिंदू कर्मचाऱ्यांचे? म्हणूनच ८५ टक्के लोकसंख्येने आता मोदी सरकारविरुद्ध जागृत झाले पाहिजे, असे आवाहनही आझमी यांनी केले. नव्या शिक्षण धोरणातूनही समाजाची विभागणी करण्याचेच काम होणार आहे. श्रीमंतांचा मुला जादा पैसे भरून शिकेल, पण गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळणेही कठीण होणार आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने इतर बाबींवरील खर्च कमी करून शिक्षणावर जादा खर्च करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी नोंदविली.

(CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती)

आता लॉकडाऊन नकोचमागच्या वेळी लॉकडाऊन झाला, तेव्हा अनेक समाजसेवक पुढे आले. त्यांनी गरजूंना अन्नपाणी वाटप केले. मात्र आता तेही थकले आहेत. आता जर लाॅकडाऊन झाले, तर लोक कोरोनापेक्षा भूक आणि बेकारीमुळे मरतील. त्यामुळे सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ नये. घ्यायचाच असेल, तर आधी गरिबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आमदार अबू असीम आझमी यांनी केली.

(CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी)

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीYavatmalयवतमाळPoliticsराजकारणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसParam Bir Singhपरम बीर सिंगSharad Pawarशरद पवार