शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती

By admin | Updated: April 23, 2015 00:00 IST

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा ...

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.

जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला ०५ जागा तर शिवसेनेला ०१ आणि अपक्षाला ०४ जागेवर विजय मिळविता आला आहे.

पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १६ जागासाठी झालेल्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या अपक्षाच्या हाती लागल्या आहेत. सर्वाधिक ०९ जागेवर अपक्ष विजयी झाले असून भाजपाला ०७ जागा मिळाल्या आहेत.

कुळगाव-बदलापुरातील ४७ जागापैकी शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २० जागा राष्ट्रवादीला ०२ जागा तर एका अपक्षाला विजय मिळविता आला आहे.

अंबरनाथमधील ५७ जागांपैकी शिवसेनेला २६ जागा भाजपाला १० जागा काँग्रेसला ०८ जागा राष्ट्रवादीला ०५ जागा मनसेला ०२ जागा तर अपक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २९ जागा आवश्यक असल्याने अंबरनाथ नगर परीषदेवर भगवा झेंडा फडकणार हे निश्चित आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकासोबतच भोकर नगर परीषदेची निवडणूक पार पडली. भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्यानं त्याकडं लक्ष लागलं होतं. बालेकिल्ला राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं आहे. १९ जागा असलेल्या भोकर नगर परीषदेत काँग्रेसला १२ जागा राष्ट्रवादीला ०३ भाजपाला ०२ तर अपक्षाला २ जागा मिळाल्या. १२ जागा मिळाल्यानंतरही आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी म्हटंलं आहे.

औरंगाबादमध्ये अनेक वर्षापासून असलेली सत्ता शिवसेनेने कायम राखण्यात यश मिळवले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या "एमआयएम"ने २५ जागेवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली. तर बसलाला ५ जागा मिळविण्यात यश आले. शिवसेना ३५ एमआयएम २५ भाजप २३ काँग्रेस १० आरपीआय डेमोक्रॅटिक १ तर इतर १२ जागेवर विजयी झाले आहेत.

नवी मुंबईतील १११ जागेसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची तसेच अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५३ जागा शिवसेनेला ३७ जागा काँग्रेसला १० जागा भाजपला ०६ जागा तर अपक्षाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.