शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती

By admin | Updated: April 23, 2015 00:00 IST

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा ...

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.

जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला ०५ जागा तर शिवसेनेला ०१ आणि अपक्षाला ०४ जागेवर विजय मिळविता आला आहे.

पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १६ जागासाठी झालेल्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या अपक्षाच्या हाती लागल्या आहेत. सर्वाधिक ०९ जागेवर अपक्ष विजयी झाले असून भाजपाला ०७ जागा मिळाल्या आहेत.

कुळगाव-बदलापुरातील ४७ जागापैकी शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २० जागा राष्ट्रवादीला ०२ जागा तर एका अपक्षाला विजय मिळविता आला आहे.

अंबरनाथमधील ५७ जागांपैकी शिवसेनेला २६ जागा भाजपाला १० जागा काँग्रेसला ०८ जागा राष्ट्रवादीला ०५ जागा मनसेला ०२ जागा तर अपक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २९ जागा आवश्यक असल्याने अंबरनाथ नगर परीषदेवर भगवा झेंडा फडकणार हे निश्चित आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकासोबतच भोकर नगर परीषदेची निवडणूक पार पडली. भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्यानं त्याकडं लक्ष लागलं होतं. बालेकिल्ला राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं आहे. १९ जागा असलेल्या भोकर नगर परीषदेत काँग्रेसला १२ जागा राष्ट्रवादीला ०३ भाजपाला ०२ तर अपक्षाला २ जागा मिळाल्या. १२ जागा मिळाल्यानंतरही आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी म्हटंलं आहे.

औरंगाबादमध्ये अनेक वर्षापासून असलेली सत्ता शिवसेनेने कायम राखण्यात यश मिळवले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या "एमआयएम"ने २५ जागेवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली. तर बसलाला ५ जागा मिळविण्यात यश आले. शिवसेना ३५ एमआयएम २५ भाजप २३ काँग्रेस १० आरपीआय डेमोक्रॅटिक १ तर इतर १२ जागेवर विजयी झाले आहेत.

नवी मुंबईतील १११ जागेसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची तसेच अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५३ जागा शिवसेनेला ३७ जागा काँग्रेसला १० जागा भाजपला ०६ जागा तर अपक्षाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.