शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

नवमतदारांचा कौल कोणाला?

By यदू जोशी | Updated: April 18, 2019 05:15 IST

विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले.

- यदु जोशीमुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यात निवडणूक आयोगाने राबविलेली विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी राबविलेले अभियान, त्यासाठी जाहिरातींद्वारे केलेली जनजागृती आणि नवमतदारांचा प्रतिसाद यामुळे दोन महिन्यात १२ लाख ३० हजार मतदार वाढले. निवडणूक निकाल बदलवू शकेल इतकी मोठी ही संख्या आहे. नवमतदारांचा कौल त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.या मतदारांपैकी ८५ टक्के हे नवमतदार असून ते या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत. ३० मार्चपर्यंत राज्यात मतदार नोंदणीचे काम सुरू होते. त्यानंतर आता आयोगाने राज्यातील एकूण अंतिम मतदारसंख्या दिली आहे. त्यानुसार आता राज्यात ८ कोटी ८५ लाख ६१ हजार ३४५ मतदार आहेत. दोन महिन्यांपूर्वी हाच आकडा ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ इतका होता. पुरुष मतदारांची एकूण संख्या ४ कोटी ६३ लाख १४ हजार ७७६ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी २२ लाख ४४ हजार ३७ आहे.पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीने प्रभावित तरुणाईने भरभरुन मतदारनोंदणी केली, असे भाजपचे म्हणणे आहे. तर मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे निघत असताना बघून हे सरकार पुन्हा नको, या भावनेने मोठ्या प्रमाणात नवमतदारांनी नोंदणी केली, असे काँग्रेसने म्हटले आहे. दोन महिन्यांत साडेबारा लाखने वाढलेले हे मतदार कुणाकडे वळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.महिला उमेदवार वाढले२०१४ मध्ये राज्यात ६९ महिला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यावेळी ही संख्या ११ ने वाढून ८० इतकी झाली आहे. राज्यात सध्या भावना गवळी, सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे आणि हिना गावित या ६ महिला खासदार आहेत.२०८६ तृतीयपंथी मतदारराज्यात तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या २ हजार ८६ इतकी आहे. त्यात सर्वाधिक मतदारसंख्या (३२४) ही उत्तर मुंबईत आहे. बोटावर मोजण्याइतके कमी तृतीयपंथी मतदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, लातूरचा समावेश आहे.>सर्वाधिक मतदार ठाण्यातठाणे हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा मतदारसंघ आहे. त्या खालोखाल मावळ, नागपूर, शिरुर, शिर्डी, पुणे या मतदारसंघांचा क्रम लागतो. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण-मध्य, गडचिरोली-चिमूर आदी मतदारसंघांत कमी मतदारसंख्या आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019