शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या जयजयकारात गैर काय?; राजनाथ सिंह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:09 IST

मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका

मीरा रोड : इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले, तेव्हा इंदिराजींचा जयजयकार होऊ शकतो, मग पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून मोदींचा जयजयकार का नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी शिवार उद्यानात आयोजित सभेसाठी राजनाथ आले होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर डिम्पल मेहता, आमदार प्रताप सरनाईक व नरेंद्र मेहता, सभापती रवी व्यास, गटनेते हसमुख गेहलोत आदींसह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. सभेचे ठिकाण लहान असल्याने उपस्थितांची संख्या कमी होती. काँग्रेस सरकारने ३० वर्षांत लढाऊ विमाने खरेदी केली नाहीत. आज राफेल विमान असते, तर देशात बसूनच पाकिस्तानातील अतिरेक्यांवर कारवाई करता आली असती; पण विरोधक फक्त मोदींना रोखण्याचा नकारात्मक विचार घेऊन खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. सीमेवर गोळीबार झाल्यास १७ वेळा पांढरे निशाण फडकवले जायचे. ते आपण बंद करायला लावले. गोळीला गोळ्यांनी उत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे राजनाथ यांनी सांगितले.‘पवारांनी हवा ओळखलीय’युती झाल्याने शरद पवारांनी देशाची हवा ओळखून उमेदवारी मागे घेतली, असा चिमटा काढतानाच, पवारांचा खूप आदर करतो, असेही ते म्हणाले. नेहरूंपासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस गरिबीचा मुद्दा पुढे करत आली आहे; पण इतकी वर्षे सत्तेत असूनही गरिबी हटवण्यासाठी उपाययोजना का केल्या नाही, असा सवाल राजनाथ यांनी या वेळी केला.‘इव्हीएममध्ये घोटाळा नाही’नालासोपारा : इव्हिएम मशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही. जर असे काही असते, तर राजस्थान-मध्य प्रदेश-छत्तीसगड राज्यात काँग्रेसची सत्ता कशी आली? त्यामुळे काँग्रेसचा हा आरोप म्हणजे केवळ दुतोंडीपणा आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत ते बोलत होते. सिंह म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएमबद्दल काँग्रेस नेते का बोलले नाहीत? असा सवालही त्यांनी केला. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी युतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.खासदार राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून, हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तुतिसुमने त्यांनी उधळली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक