शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या जयजयकारात गैर काय?; राजनाथ सिंह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:09 IST

मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका

मीरा रोड : इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले, तेव्हा इंदिराजींचा जयजयकार होऊ शकतो, मग पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून मोदींचा जयजयकार का नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी शिवार उद्यानात आयोजित सभेसाठी राजनाथ आले होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर डिम्पल मेहता, आमदार प्रताप सरनाईक व नरेंद्र मेहता, सभापती रवी व्यास, गटनेते हसमुख गेहलोत आदींसह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. सभेचे ठिकाण लहान असल्याने उपस्थितांची संख्या कमी होती. काँग्रेस सरकारने ३० वर्षांत लढाऊ विमाने खरेदी केली नाहीत. आज राफेल विमान असते, तर देशात बसूनच पाकिस्तानातील अतिरेक्यांवर कारवाई करता आली असती; पण विरोधक फक्त मोदींना रोखण्याचा नकारात्मक विचार घेऊन खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. सीमेवर गोळीबार झाल्यास १७ वेळा पांढरे निशाण फडकवले जायचे. ते आपण बंद करायला लावले. गोळीला गोळ्यांनी उत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे राजनाथ यांनी सांगितले.‘पवारांनी हवा ओळखलीय’युती झाल्याने शरद पवारांनी देशाची हवा ओळखून उमेदवारी मागे घेतली, असा चिमटा काढतानाच, पवारांचा खूप आदर करतो, असेही ते म्हणाले. नेहरूंपासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस गरिबीचा मुद्दा पुढे करत आली आहे; पण इतकी वर्षे सत्तेत असूनही गरिबी हटवण्यासाठी उपाययोजना का केल्या नाही, असा सवाल राजनाथ यांनी या वेळी केला.‘इव्हीएममध्ये घोटाळा नाही’नालासोपारा : इव्हिएम मशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही. जर असे काही असते, तर राजस्थान-मध्य प्रदेश-छत्तीसगड राज्यात काँग्रेसची सत्ता कशी आली? त्यामुळे काँग्रेसचा हा आरोप म्हणजे केवळ दुतोंडीपणा आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत ते बोलत होते. सिंह म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएमबद्दल काँग्रेस नेते का बोलले नाहीत? असा सवालही त्यांनी केला. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी युतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.खासदार राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून, हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तुतिसुमने त्यांनी उधळली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक