शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रेमडेसिविर वितरण स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:30 IST

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे देण्याची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारची भूमिका ही साहाय्यकाची आणि मार्गदर्शनाची आहे. तर, राज्य सरकारांची यंत्रणा प्रत्यक्ष लढ्यात अग्रभागी आहेत. अशा वेळी रेमडेसिविरसारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय, असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे देण्याची मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात गेल्या शंभर वर्षांत इतके मोठे आरोग्य संकट आले नसावे. हे आव्हान म्हणूनच फार मोठे आहे, असे सांगतानाच रेमडेसिविरसारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार असल्याचे वृत्त वाचून धक्का बसल्याचे राज म्हणाले.अशा प्रकारे वितरण स्वतःकडे ठेवल्याने प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच; शिवाय त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कसे घ्यायचे, कुठे, कसे वितरित करायचे याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरे तर केंद्राचे नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या