शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:35 IST

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहेदारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून विजय मिळवणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचाममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दारुण पराभव केला आहे. दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये अखेरीच लोकांचे मत महत्त्वाचे असते, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे, असा टोला लगावला. ("BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP  after victory in West Bengal)

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमधून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांना ते आवडते. लोकांनीच त्यासाठी रस्ता दाखवला आहे. लोकशाहीमध्ये अहंकार दाखवता कामा नये. भाजपा एक जातियवादी पक्ष आहे. ते संकटं निर्माण करतात. फेक व्हिडीओंचा उपयोग करतात. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात. भाजपा या देशाच्या घटनात्मक चौकटीला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.  भाजपा सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी देत नाही आहे. ते ऑक्सिजन देत नाही आहेत. त्यांना पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले. यावेळी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनाही टोला लगावला, सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा उपयोग करणारे राजकारण होता कामा नये. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या राजकारणाचा अंत असेल. भाजपाचे जुन्या नेत्यांनीही मोदी-शाहा स्टाइल राजकारणावर टीका केलेली आहे. देश आता अशा प्रकारच्या राजकारणाचा सामना करू शकणार नाही. मोदी-शाहांच्या तुलनेक अनेक चांगले उमेदवार देशात आहेत, असेही त्या म्हणाल्या.निकालांनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे खापरही त्यांनी भाजपाच्या माथ्यावर फोडले. हा भाजपाचा प्रोपेगेंडा आहे. काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक राज्यात घडतात. त्या योग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण दारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाविरोधात लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा