शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:35 IST

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहेदारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून विजय मिळवणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचाममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दारुण पराभव केला आहे. दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये अखेरीच लोकांचे मत महत्त्वाचे असते, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे, असा टोला लगावला. ("BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP  after victory in West Bengal)

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमधून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांना ते आवडते. लोकांनीच त्यासाठी रस्ता दाखवला आहे. लोकशाहीमध्ये अहंकार दाखवता कामा नये. भाजपा एक जातियवादी पक्ष आहे. ते संकटं निर्माण करतात. फेक व्हिडीओंचा उपयोग करतात. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात. भाजपा या देशाच्या घटनात्मक चौकटीला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.  भाजपा सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी देत नाही आहे. ते ऑक्सिजन देत नाही आहेत. त्यांना पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले. यावेळी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनाही टोला लगावला, सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा उपयोग करणारे राजकारण होता कामा नये. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या राजकारणाचा अंत असेल. भाजपाचे जुन्या नेत्यांनीही मोदी-शाहा स्टाइल राजकारणावर टीका केलेली आहे. देश आता अशा प्रकारच्या राजकारणाचा सामना करू शकणार नाही. मोदी-शाहांच्या तुलनेक अनेक चांगले उमेदवार देशात आहेत, असेही त्या म्हणाल्या.निकालांनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे खापरही त्यांनी भाजपाच्या माथ्यावर फोडले. हा भाजपाचा प्रोपेगेंडा आहे. काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक राज्यात घडतात. त्या योग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण दारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाविरोधात लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा