शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:35 IST

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहेदारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून विजय मिळवणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचाममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दारुण पराभव केला आहे. दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये अखेरीच लोकांचे मत महत्त्वाचे असते, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे, असा टोला लगावला. ("BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP  after victory in West Bengal)

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमधून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांना ते आवडते. लोकांनीच त्यासाठी रस्ता दाखवला आहे. लोकशाहीमध्ये अहंकार दाखवता कामा नये. भाजपा एक जातियवादी पक्ष आहे. ते संकटं निर्माण करतात. फेक व्हिडीओंचा उपयोग करतात. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात. भाजपा या देशाच्या घटनात्मक चौकटीला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.  भाजपा सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी देत नाही आहे. ते ऑक्सिजन देत नाही आहेत. त्यांना पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले. यावेळी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनाही टोला लगावला, सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा उपयोग करणारे राजकारण होता कामा नये. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या राजकारणाचा अंत असेल. भाजपाचे जुन्या नेत्यांनीही मोदी-शाहा स्टाइल राजकारणावर टीका केलेली आहे. देश आता अशा प्रकारच्या राजकारणाचा सामना करू शकणार नाही. मोदी-शाहांच्या तुलनेक अनेक चांगले उमेदवार देशात आहेत, असेही त्या म्हणाल्या.निकालांनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे खापरही त्यांनी भाजपाच्या माथ्यावर फोडले. हा भाजपाचा प्रोपेगेंडा आहे. काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक राज्यात घडतात. त्या योग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण दारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाविरोधात लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा