शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 3, 2020 14:01 IST

West Bengal Election 2020: भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला

कोलकाता: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकवण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली आहे. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं गेल्या काही महिन्यांपासूनच जोर लावला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उतरवणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र गांगुली सध्या तरी तरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उत्सुक नसल्याचं कळतं आहे. मी राजकारणात उतरणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारदेखील करणार नाही, असं गांगुली यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला कळवलं असल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं दिलं आहे.मला सक्रिय राजकारणात उतरण्यात रस नसल्याचं सौरव गांगुली यांनी गेल्या महिन्यात भाजपला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. 'मी सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. त्यात मी खूष आहे,' असं गांगुली यांनी भाजप नेतृत्त्वाला कळवलं. गांगुली यांनी त्यांचं मत स्पष्ट केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही, असंदेखील 'द टेलिग्राफ'नं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.राज्यात सौरव गांगुली यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, यासाठी पक्षाकडून बरेच प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 'सौरव गांगुली यांनी पक्षासाठी काम करावं यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र सध्या ते दुसऱ्या भूमिकेत व्यग्र आहेत. गेल्या काही महिन्यांत बंगालमधील स्थिती खूप बदलली आहे. पक्षानं राज्यात खूप मोठी ताकद कमावली आहे,' असं सुत्रांनी सांगितलं.पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सामर्थ्यात वाढ२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९५ पैकी २११ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २७ जागा अधिक जिंकत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्या. या निवडणुकीत भाजपनं ३ जागांवर विजय मिळवला. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारली. २०१४ मध्ये अवघ्या २ जागा जिंकणाऱ्या भाजपनं गेल्या वर्षी तब्बल १८ जागा जिंकल्या. याचा थेट फटका तृणमूलला बसला. २०१४ मध्ये ३४ जागा जिंकणाऱ्या ममतांना २०१९ मध्ये २२ जागांवर समाधान मानावं लागेल. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSaurav Gangulyसौरभ गांगुलीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस