शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 3, 2020 14:01 IST

West Bengal Election 2020: भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला

कोलकाता: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकवण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली आहे. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं गेल्या काही महिन्यांपासूनच जोर लावला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उतरवणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र गांगुली सध्या तरी तरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उत्सुक नसल्याचं कळतं आहे. मी राजकारणात उतरणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारदेखील करणार नाही, असं गांगुली यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला कळवलं असल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं दिलं आहे.मला सक्रिय राजकारणात उतरण्यात रस नसल्याचं सौरव गांगुली यांनी गेल्या महिन्यात भाजपला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. 'मी सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. त्यात मी खूष आहे,' असं गांगुली यांनी भाजप नेतृत्त्वाला कळवलं. गांगुली यांनी त्यांचं मत स्पष्ट केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही, असंदेखील 'द टेलिग्राफ'नं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.राज्यात सौरव गांगुली यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, यासाठी पक्षाकडून बरेच प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 'सौरव गांगुली यांनी पक्षासाठी काम करावं यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र सध्या ते दुसऱ्या भूमिकेत व्यग्र आहेत. गेल्या काही महिन्यांत बंगालमधील स्थिती खूप बदलली आहे. पक्षानं राज्यात खूप मोठी ताकद कमावली आहे,' असं सुत्रांनी सांगितलं.पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सामर्थ्यात वाढ२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९५ पैकी २११ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २७ जागा अधिक जिंकत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्या. या निवडणुकीत भाजपनं ३ जागांवर विजय मिळवला. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारली. २०१४ मध्ये अवघ्या २ जागा जिंकणाऱ्या भाजपनं गेल्या वर्षी तब्बल १८ जागा जिंकल्या. याचा थेट फटका तृणमूलला बसला. २०१४ मध्ये ३४ जागा जिंकणाऱ्या ममतांना २०१९ मध्ये २२ जागांवर समाधान मानावं लागेल. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSaurav Gangulyसौरभ गांगुलीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस