शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 3, 2020 14:01 IST

West Bengal Election 2020: भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला

कोलकाता: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकवण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली आहे. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं गेल्या काही महिन्यांपासूनच जोर लावला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उतरवणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र गांगुली सध्या तरी तरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उत्सुक नसल्याचं कळतं आहे. मी राजकारणात उतरणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारदेखील करणार नाही, असं गांगुली यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला कळवलं असल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं दिलं आहे.मला सक्रिय राजकारणात उतरण्यात रस नसल्याचं सौरव गांगुली यांनी गेल्या महिन्यात भाजपला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. 'मी सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. त्यात मी खूष आहे,' असं गांगुली यांनी भाजप नेतृत्त्वाला कळवलं. गांगुली यांनी त्यांचं मत स्पष्ट केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही, असंदेखील 'द टेलिग्राफ'नं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.राज्यात सौरव गांगुली यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, यासाठी पक्षाकडून बरेच प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 'सौरव गांगुली यांनी पक्षासाठी काम करावं यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र सध्या ते दुसऱ्या भूमिकेत व्यग्र आहेत. गेल्या काही महिन्यांत बंगालमधील स्थिती खूप बदलली आहे. पक्षानं राज्यात खूप मोठी ताकद कमावली आहे,' असं सुत्रांनी सांगितलं.पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सामर्थ्यात वाढ२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९५ पैकी २११ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २७ जागा अधिक जिंकत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्या. या निवडणुकीत भाजपनं ३ जागांवर विजय मिळवला. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारली. २०१४ मध्ये अवघ्या २ जागा जिंकणाऱ्या भाजपनं गेल्या वर्षी तब्बल १८ जागा जिंकल्या. याचा थेट फटका तृणमूलला बसला. २०१४ मध्ये ३४ जागा जिंकणाऱ्या ममतांना २०१९ मध्ये २२ जागांवर समाधान मानावं लागेल. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSaurav Gangulyसौरभ गांगुलीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस