शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

West Bengal Election : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले,"बेगम ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला बनवतील मिनी पाकिस्तान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 09:12 IST

West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

ठळक मुद्देसुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. सोमवापी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार केला. "ममता बॅनर्जी यांना ईद मुबारक म्हणण्याची सवय आहे. म्हणून त्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी होली मुबारक असं म्हटलं. बेगमना मतदान करू नका. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम अचानक बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरात जाऊ लागल्या आहेत, कारण त्यांना पराभवाची भीती आहे," असं म्हणत अधिकारी यांनी निशाणा साधला."जे लोकं आज या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले आहेत ते बाहेरून आले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरते राहिले आहेत. निवडणुकीनंतर ते उडून जातील. परंतु आपण या ठिकाणचे स्थायी निवासी आहोत आणि लोकांच्या सुख दु:खासाठी काय उपलब्ध असू," असं अधिकारी म्हणाले.  ममता बॅनर्जी यांची एक कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. "ऑडिओमध्ये ऐकू शकतो. त्या नंदीग्राममध्ये पहिलेही येत नव्हत्या आणि नंतरही येणार नाहीत. अशात त्या सातत्यानं खोटं बोलत आहेत की नंदीग्रामच्या लोकांसाठी त्या कायम उपलब्ध असतील. परंतु त्या नंदीग्राममध्ये कधी येणार नाहीत हे सत्य आहे," असंही ते म्हणाले. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी