शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले,"बेगम ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला बनवतील मिनी पाकिस्तान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 09:12 IST

West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

ठळक मुद्देसुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. सोमवापी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार केला. "ममता बॅनर्जी यांना ईद मुबारक म्हणण्याची सवय आहे. म्हणून त्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी होली मुबारक असं म्हटलं. बेगमना मतदान करू नका. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम अचानक बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरात जाऊ लागल्या आहेत, कारण त्यांना पराभवाची भीती आहे," असं म्हणत अधिकारी यांनी निशाणा साधला."जे लोकं आज या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले आहेत ते बाहेरून आले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरते राहिले आहेत. निवडणुकीनंतर ते उडून जातील. परंतु आपण या ठिकाणचे स्थायी निवासी आहोत आणि लोकांच्या सुख दु:खासाठी काय उपलब्ध असू," असं अधिकारी म्हणाले.  ममता बॅनर्जी यांची एक कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. "ऑडिओमध्ये ऐकू शकतो. त्या नंदीग्राममध्ये पहिलेही येत नव्हत्या आणि नंतरही येणार नाहीत. अशात त्या सातत्यानं खोटं बोलत आहेत की नंदीग्रामच्या लोकांसाठी त्या कायम उपलब्ध असतील. परंतु त्या नंदीग्राममध्ये कधी येणार नाहीत हे सत्य आहे," असंही ते म्हणाले. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी