शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

"ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 14:26 IST

West Bengal Assembly Elections 2021, Subhendu Adhikari Challenge to Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेले नंदिग्राममधील वजनदार नेते शुभेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नंदिग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी अशी थेट लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेली चढाओढ सध्याच टोकाला पोहोचली आहे. त्यातच नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आल्यापासून वातावरण अधिकच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेले नंदिग्राममधील वजनदार नेते शुभेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नंदिग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी अशी थेट लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघातील निवडणुकीत ममता बॅनर्जींना पराभूत करू, असा विश्वास शुभेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला. ("I will defeat Mamata Banerjee, I will win the battle of Nandigram," Subhendu Adhikari Challenge to Mamata Banerjee)

हल्दियामध्ये पदयात्रेदरम्यान शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्याविरोधात उभ्या राहिल्या आहेत. मात्र तुम्ही चिंता करू नका. मी त्यांना पराभूत करेन. माझ्या पोस्टरला काळे फासले गेले. माझे झेंडे फेकून देण्यात आले. मी विचारतो की, तोहा सिद्धिकी टीएमसीचा कोण आहे. अब्बास सिद्धिकी कोण आहे. कुणी साधू ममतांच्या मंचावर का नव्हता, कुठे आहे सबका साथ, सबका विकास, असा प्रतिप्रश्न शुभेंदू अधिकारी यांनी विचारला आहे. 

 यावेळी नंदिग्राम येथे झालेल्या प्रचार सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही संबोधित केले. त्या म्हणाल्या की, मी ममता दिदींना विचारू इच्छिते की, कुठल्या मुलीला मत द्यायचे आहे? ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला कुणी मारहाण केली? भाजपा कार्यकर्त्यांची हत्या कुणी केली. दूर्गा मूर्तींचं विसर्जन आणि सरस्वती पूजनाची परवानगी कोण देत नसे? जेव्हा त्या नंदिग्रामला येतात आणिखेला होबे म्हणतात तेव्हा चंडीपाठ कोण करते, असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला. तसेच नंदिग्राम बोले जय श्रीराम असा नाराही दिला. 

दरम्यान, आज नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत स्मृती इराणी, बाबुल सुप्रियो आणि धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. तर १० मार्च रोजी या ठिकाणाहून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.   

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा