शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

West Bengal Assembly Election 2021: पंतप्रधान मोदी ‘सुपरह्यूमन’ आहेत का?; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:59 IST

भाजपला केले लक्ष्य; ‘ते’ महिलांचा अपमान करत असल्याचा तृणमूलचा आरोप

खानाकुल (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तृणमूलच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सहा टप्प्यांचे मतदान शिल्लक असताना विधानसभा निवडणुकीत मोदी भाजपच्या विजयाचा दावा करत आहे. मोदी हे देव आहेत की ‘सुपरह्यूमन’ असा प्रश्न ममता यांनी विचारला आहे. हुगली जिल्ह्यातील प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.ममता यांनी ‘आयएसएफ’चे (इंडियन सेक्युलर फ्रंट) संस्थापक अब्बास सिद्दीकी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. अल्पसंख्याक मते विभाजित व्हावीत यासाठी भाजप त्यांचे समर्थन करत आहे. राज्यात मत विभाजनासाठी आलेल्या व्यक्तिला भाजपाकडून पैसे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्यामुळे तेथे दंगली भडकल्या. बंगालमधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणूक आयोगाला राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश देत आहेत, असा दावादेखील त्यांनी केला.जनताच त्यांना योग्य उत्तर देईलदुसरीकडे तृणमूलच्या तीन महिला नेत्यांनी पंतप्रधान मोदी महिलांचा अनादर करत असल्याचा आरोप केला आहे. मोदी प्रचारसभेत उपहासात्मकपणे ‘दीदी ओ दीदी...’ असे म्हणत केवळ बॅनर्जी यांचाच नव्हे तर महिलांचा अपमान करत आहेत. भाजपच्या नेत्यांचे असे वागणे अयोग्य आहे. जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असे प्रतिपादन बंगालच्या मंत्री शशी पांजा यांनी केले.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी