शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हम पाच म्हणतच करावे लागणार नववर्षाचे सेलिब्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 21:25 IST

मनमाड : ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाच लोकांसमवेतच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.

ठळक मुद्देजमावबंदीचा आदेश : तरुणाईचा हिरमोड, शेत-शिवारात नियोजन

मनमाड : ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाच लोकांसमवेतच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या राज्यात डोकेदुखी ठरत असल्याने त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने काही सुधारित निर्बंध घालून दिले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार, जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली असून, त्यानुसार रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. शनिवार (दि. २५)पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात शनिवार, २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४नुसार जमावबंदी आदेश लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या कडक सूचना आहेत.इन्फोशेत-शिवारात आयोजनराज्य सरकारने ह्यनाईट कर्फ्यूह्णचा निर्णय घेतल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोशी स्वागत कसे करावे, असा प्रश्न तरुणांना पडला आहे. त्यामुळे यंदा मनमाडकरांनी नववर्षाचे स्वागत शेत-शिवारात तसेच गोव्यात जाऊन करण्याचा बेत आखला आहे. ग्रामीण भागातील फार्म हाऊसलाही मागणी वाढली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली नशेत बेदरकारपणे गाड्या चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी मनमाड शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टीफर्स्टला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निरीक्षकांनी दिली.तारेवरची कसरत होणारत्र्यंबकेश्वर : नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तसेच त्र्यंबकेश्वर ते अंबोली रस्त्यावरील हॉटेल्स ह्यथर्टीफर्स्टह्णच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजली असली, तरी जमावबंदीच्या आदेशामुळे तरुणाईचा हिरमोड झाला आहे. एकीकडे थर्टीफर्स्टचा आनंद, दुसरीकडे कायद्याचा बडगा तर तिसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तथा ओमायक्रॉनची भीती यामुळे हॉटेल व्यावसायिक, पार्ट्यांचा आनंद घेणारे नागरिक व पोलीस यंत्रणा यांची तारेवरची कसरत बघायला मिळणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसcity chowkसिटी चौक