शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

Video: “शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना”; संभाजीनगर नामांतरणावरून भाजपाची बोचरी टीका

By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 15:34 IST

१९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला

ठळक मुद्देशिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागतेएकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला आज त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहेऔरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो

मुंबई - औरंगाबादचं संभाजीनगर करण्यात यावं अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं सूपर संभाजीनगर घोषणा केली आणि संभाजीनगर नामांतरण झालं पाहिजे अशी मागणी केली, शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यापद्धतीने बोलावले आणि जी वागणूक दिली, त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागते, त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष नामांतरणावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच १९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला, त्याला युती सरकारने मंजुरी दिली, त्यानंतर काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद जे सध्या राष्ट्रवादीत आहेत, ते हायकोर्टात गेले. तेथे हायकोर्टाने त्यांचे म्हणणं फेटाळलं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार आलं, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांतरणाची सूचना मागे घेत असल्याचं सांगितले अशी माहिती केशव उपाध्येंनी दिली.

त्याचसोबत २०११ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अशाप्रकारचा प्रस्ताव आला, त्याकाळातही आघाडी सरकारने हा प्रस्ताव पुन्हा फेटाळला, एकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला आज त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे. २०१७, २०१८, २०१९, २०२० या काळात सातत्याने औरंगाबद महापालिकेत भाजपा औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्यात यावं असा प्रस्ताव आणण्याची मागणी केली, २० डिसेंबर २०१९ रोजीही भाजपाने स्मरण पत्र पाठवून शिवसेनेला आठवण करून दिली. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव शिवसेनेने महापालिकेत दाखल करून घेतला नाही. बोर्डावरदेखील प्रस्ताव ठेवला नाही. भाजपा नगरसेवक राजू शिंदे यांनी पुन्हा स्मरण पत्र पाठवून चौथ्यांदा प्रस्तावाची आठवण करून दिली, त्यावर शिवसेनेच्या महापौरांनी वारंवार स्मरण पत्र देऊ नये असं भाजपा नगरसेवकाला बजावलं, ते महापालिकेच्या इतिवृत्तात आहे असा आरोप केला.

भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा ५ जुलै २०१७, ७ ऑगस्ट २०१८, २२ नोव्हेंबर २०११ मध्ये तीन पत्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असं महापालिकेला पाठवलं, त्यावेळीही शिवसेनेने अशाप्रकारे प्रस्ताव देऊ नका असं नेत्यांना बजावलं, ज्यांची प्रामाणिक इच्छा असते, ते अशाप्रकारे वेळकाढूपणा करत नाहीत. औरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो. त्यामुळे औरंगजेबाची वृत्तीप्रमाणे शिवसेना कृती करतेय असा आरोप केशव उपाध्येंनी केला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद