शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Video: “शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना”; संभाजीनगर नामांतरणावरून भाजपाची बोचरी टीका

By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 15:34 IST

१९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला

ठळक मुद्देशिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागतेएकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला आज त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहेऔरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो

मुंबई - औरंगाबादचं संभाजीनगर करण्यात यावं अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं सूपर संभाजीनगर घोषणा केली आणि संभाजीनगर नामांतरण झालं पाहिजे अशी मागणी केली, शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यापद्धतीने बोलावले आणि जी वागणूक दिली, त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागते, त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष नामांतरणावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच १९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला, त्याला युती सरकारने मंजुरी दिली, त्यानंतर काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद जे सध्या राष्ट्रवादीत आहेत, ते हायकोर्टात गेले. तेथे हायकोर्टाने त्यांचे म्हणणं फेटाळलं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार आलं, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांतरणाची सूचना मागे घेत असल्याचं सांगितले अशी माहिती केशव उपाध्येंनी दिली.

त्याचसोबत २०११ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अशाप्रकारचा प्रस्ताव आला, त्याकाळातही आघाडी सरकारने हा प्रस्ताव पुन्हा फेटाळला, एकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला आज त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे. २०१७, २०१८, २०१९, २०२० या काळात सातत्याने औरंगाबद महापालिकेत भाजपा औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्यात यावं असा प्रस्ताव आणण्याची मागणी केली, २० डिसेंबर २०१९ रोजीही भाजपाने स्मरण पत्र पाठवून शिवसेनेला आठवण करून दिली. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव शिवसेनेने महापालिकेत दाखल करून घेतला नाही. बोर्डावरदेखील प्रस्ताव ठेवला नाही. भाजपा नगरसेवक राजू शिंदे यांनी पुन्हा स्मरण पत्र पाठवून चौथ्यांदा प्रस्तावाची आठवण करून दिली, त्यावर शिवसेनेच्या महापौरांनी वारंवार स्मरण पत्र देऊ नये असं भाजपा नगरसेवकाला बजावलं, ते महापालिकेच्या इतिवृत्तात आहे असा आरोप केला.

भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा ५ जुलै २०१७, ७ ऑगस्ट २०१८, २२ नोव्हेंबर २०११ मध्ये तीन पत्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असं महापालिकेला पाठवलं, त्यावेळीही शिवसेनेने अशाप्रकारे प्रस्ताव देऊ नका असं नेत्यांना बजावलं, ज्यांची प्रामाणिक इच्छा असते, ते अशाप्रकारे वेळकाढूपणा करत नाहीत. औरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो. त्यामुळे औरंगजेबाची वृत्तीप्रमाणे शिवसेना कृती करतेय असा आरोप केशव उपाध्येंनी केला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद