शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

“...म्हणून वरूण सरदेसाईंना संरक्षणाची गरज आहे”; आमदार नितेश राणेंनी सांगितलं खरं ‘कारण’

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 12:20 IST

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देविरोधकांची सुरक्षा कमी करण्याचा घाट घालतंय, परंतु आमचा आवाज बुलंद राहणारवरूण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे सरकारला चिमटा काढलासरकारने घेतलेला निर्णय योग्य, भाजपा आमदार नितेश राणेंचा चिमटा

मुंबई – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, राम कदम या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी राजकारण करून विरोधकांची सुरक्षा कमी करण्याचा घाट घालतंय, परंतु आमचा आवाज बुलंद राहणार असं विरोधक म्हणत आहेत, तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जातो, त्यानंतर कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा वाढवायची याबाबत निर्णय घेतले जातात असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.

यातच सुरक्षा देण्याच्या यादीत शिवसेनेच्या युवासेनेचे वरूण सरदेसाई यांचे नाव असल्यानं भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या लोकांच्या जीविताला धोका असतो अशांना सुरक्षा दिली जाते, मात्र या यादीवरून वाटते महाविकास आघाडीने विरोधकांची सुरक्षा कमी करून राजकारण केलं आहे असं भाजपाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.

याबाबत नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारने युवासेनेच्या वरूण सरदेसाईंना सुरक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य पाऊल आहे, कारण त्याला खरोखरचं सुरक्षेची गरज आहे. कारण वरूण सरदेसाईचा मंत्रालयात फिरणाऱ्या फाईल्सवर जेव्हापासून अंकुश आला आहे तेव्हापासून प्रशासनातील काही अधिकारी त्याच्यावर प्रचंड रागावलेले आहेत असं ऐकण्यात आलं आहे, त्यासाठी त्याला सुरक्षेची नितांत गरज आहे असा टोला नितेश राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

कोण आहेत वरूण सरदेसाई?

वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर वाढलेला आहे. आदित्य ठाकरेंना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पहिल्यांदा वरूण सरदेसाई यांनीच केली होती. त्याचसोबत ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरूण सरदेसाईंचा मोठा वाटा होता.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे