शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

“...म्हणून वरूण सरदेसाईंना संरक्षणाची गरज आहे”; आमदार नितेश राणेंनी सांगितलं खरं ‘कारण’

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 12:20 IST

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देविरोधकांची सुरक्षा कमी करण्याचा घाट घालतंय, परंतु आमचा आवाज बुलंद राहणारवरूण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे सरकारला चिमटा काढलासरकारने घेतलेला निर्णय योग्य, भाजपा आमदार नितेश राणेंचा चिमटा

मुंबई – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, राम कदम या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी राजकारण करून विरोधकांची सुरक्षा कमी करण्याचा घाट घालतंय, परंतु आमचा आवाज बुलंद राहणार असं विरोधक म्हणत आहेत, तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जातो, त्यानंतर कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा वाढवायची याबाबत निर्णय घेतले जातात असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.

यातच सुरक्षा देण्याच्या यादीत शिवसेनेच्या युवासेनेचे वरूण सरदेसाई यांचे नाव असल्यानं भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या लोकांच्या जीविताला धोका असतो अशांना सुरक्षा दिली जाते, मात्र या यादीवरून वाटते महाविकास आघाडीने विरोधकांची सुरक्षा कमी करून राजकारण केलं आहे असं भाजपाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.

याबाबत नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारने युवासेनेच्या वरूण सरदेसाईंना सुरक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य पाऊल आहे, कारण त्याला खरोखरचं सुरक्षेची गरज आहे. कारण वरूण सरदेसाईचा मंत्रालयात फिरणाऱ्या फाईल्सवर जेव्हापासून अंकुश आला आहे तेव्हापासून प्रशासनातील काही अधिकारी त्याच्यावर प्रचंड रागावलेले आहेत असं ऐकण्यात आलं आहे, त्यासाठी त्याला सुरक्षेची नितांत गरज आहे असा टोला नितेश राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

कोण आहेत वरूण सरदेसाई?

वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर वाढलेला आहे. आदित्य ठाकरेंना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पहिल्यांदा वरूण सरदेसाई यांनीच केली होती. त्याचसोबत ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरूण सरदेसाईंचा मोठा वाटा होता.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे