शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

"ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 12:05 IST

West Bengal TMC And BJP : भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाने केलेल्या टीकेला आता तृणमुल काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान घोषवाक्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपाने (BJP) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करुन ममतांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. प्रसिद्ध वेब सीरिज मनी हाइस्टचं थीम साँग 'बेला चाओ' (Bella ciao) च्या धर्तीवर बंगाली भाषेत ‘पिशी जाओ’ (आंटी जाओ) या गाण्याद्वारे ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यात आलं होतं.

भाजपाने केलेल्या टीकेला आता तृणमुल काँग्रेसने (TMC) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तृणमुलने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या "Pawri ho rahi hai" ट्रेंडच्या आधारे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बंगालमधील भाजपाच्या जनसभेचा एक फोटो तृणमुलने आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सभेला केवळ एक व्यक्ती उपस्थित आहे तर इतर सर्व खुर्च्या रिकाम्या असलेल्या दिसत आहेत. स्टेजवरती भाषण देणाऱ्या नेत्यांचीच गर्दी आहे. फक्त एक माणूस खुर्चीवर बसला आणि अन्य सर्व खुर्च्या खाली आहेत. हा फोटो ट्विट करत तृणमुलने "ये भाजपा बंगाल है....ये उनकी जनसभा है...और यहा उनकी pawri (पार्टी) ho rahi hai!" असं म्हटलं आहे. 

टीएमसीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. याच दरम्यान भाजपाने परिवर्तन यात्रेचे आयोजन केलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अमित शहांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. "ममता बॅनर्जींचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?" असा सवाल त्यांनी केला. 

"ममता सत्तेत असताना बंगाल विकासाच्या मार्गावर चालेल का?, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?" 

अमित शहा यांनी "आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे. ममता बॅनर्जींना सत्तेपासून दूर करणं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधारणं, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधारणं हेच आमचं प्राधान्य असणार आहे" असं म्हटलं होतं. भाजपाने सुरू केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. रॅलीमधून तसेच सभांमधून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपाPoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी