शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 22:09 IST

Rupali Chakankar : येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मीरारोड  - पक्षाला गरज होती, त्या अडचणीच्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे, पदांसाठी गडबड करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाईंदर येथील महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेत २००२ पासून २०१५ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर, आमदार, खासदार देणाऱ्या ह्या शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकी आधी सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले. माजी आमदार , जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नाममात्र उरली. सध्या राष्ट्रवादीत सक्षम असा चेहरा वा नेतृत्व नाही, हे देखील तितकेच खरे आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर तसेच व्यक्तिगत हित पाहून माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसुरे आदी अनेक जण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. तर काहींच्या नावाची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी देखील कदम, पाटील आदीं मध्ये चुरस लागली आहे. हे सर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत. 

महामंडळचे अध्यक्ष पद, विरोधीपक्ष नेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पद आदी अनेक पदे राष्ट्रवादीमध्ये मिळून देखील २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्ष सोडून भाजपात गेलेले आसिफ शेख सुद्धा राष्ट्रवादीत परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यां कडे साखरपेरणी करत आहेत . त्यामुळे अडचणीच्या पडत्या काळात स्वतःच्या स्वार्था साठी राष्ट्रवादी सोडून अन्यत्र पळ काढणाऱ्या ह्या पळपुट्याना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून होत आहे. त्याचे पडसाद चाकणकर यांनी घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी देखील दिसून आले . 

चाकणकर म्हणाल्या की , "पक्ष सोडून गेलेल्यांऐवजी पक्षासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार. महिला आघाडीत तरी हाच निर्णय. पुन्हा आले तर त्यांना आधी कार्यकर्ता म्हणून कामे करण्यास सांगणार. त्यांनी पदांसाठी गडबड करू नये. आज निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. पक्ष संघटना म्हटली की बेरजेचे गणित असते. त्यामुळे पक्षात नव्याने आणि पुन्हा येणारे ही प्रक्रिया सुरूच असते. पदे द्यायला उशीर झाला, कारण कोरोना संसर्गाचे संकट होते व अजूनही कायम आहे."

याचबरोबर, पदे येतात - जातात. पदे आणखी काही महिन्यांनी वाटली तरी चालतील . काही फरक पडणार नाही. पण महाराष्ट्रवरील कोरोनाचा संकट दूर करणे महत्वाचे. मधली पाच वर्ष सत्तेत नव्हतो, आता सत्तेत आहोत. त्यामुळे आमदार - खासदार वाढतील. येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी पक्षाचे पौर्णिमा काटकर , संतोष पेंडुरकर , साजिद पटेल , सुप्रिया माईणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस