शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 22:09 IST

Rupali Chakankar : येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मीरारोड  - पक्षाला गरज होती, त्या अडचणीच्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे, पदांसाठी गडबड करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाईंदर येथील महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेत २००२ पासून २०१५ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर, आमदार, खासदार देणाऱ्या ह्या शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकी आधी सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले. माजी आमदार , जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नाममात्र उरली. सध्या राष्ट्रवादीत सक्षम असा चेहरा वा नेतृत्व नाही, हे देखील तितकेच खरे आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर तसेच व्यक्तिगत हित पाहून माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसुरे आदी अनेक जण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. तर काहींच्या नावाची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी देखील कदम, पाटील आदीं मध्ये चुरस लागली आहे. हे सर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत. 

महामंडळचे अध्यक्ष पद, विरोधीपक्ष नेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पद आदी अनेक पदे राष्ट्रवादीमध्ये मिळून देखील २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्ष सोडून भाजपात गेलेले आसिफ शेख सुद्धा राष्ट्रवादीत परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यां कडे साखरपेरणी करत आहेत . त्यामुळे अडचणीच्या पडत्या काळात स्वतःच्या स्वार्था साठी राष्ट्रवादी सोडून अन्यत्र पळ काढणाऱ्या ह्या पळपुट्याना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून होत आहे. त्याचे पडसाद चाकणकर यांनी घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी देखील दिसून आले . 

चाकणकर म्हणाल्या की , "पक्ष सोडून गेलेल्यांऐवजी पक्षासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार. महिला आघाडीत तरी हाच निर्णय. पुन्हा आले तर त्यांना आधी कार्यकर्ता म्हणून कामे करण्यास सांगणार. त्यांनी पदांसाठी गडबड करू नये. आज निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. पक्ष संघटना म्हटली की बेरजेचे गणित असते. त्यामुळे पक्षात नव्याने आणि पुन्हा येणारे ही प्रक्रिया सुरूच असते. पदे द्यायला उशीर झाला, कारण कोरोना संसर्गाचे संकट होते व अजूनही कायम आहे."

याचबरोबर, पदे येतात - जातात. पदे आणखी काही महिन्यांनी वाटली तरी चालतील . काही फरक पडणार नाही. पण महाराष्ट्रवरील कोरोनाचा संकट दूर करणे महत्वाचे. मधली पाच वर्ष सत्तेत नव्हतो, आता सत्तेत आहोत. त्यामुळे आमदार - खासदार वाढतील. येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी पक्षाचे पौर्णिमा काटकर , संतोष पेंडुरकर , साजिद पटेल , सुप्रिया माईणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस