शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 22:09 IST

Rupali Chakankar : येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मीरारोड  - पक्षाला गरज होती, त्या अडचणीच्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे, पदांसाठी गडबड करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाईंदर येथील महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेत २००२ पासून २०१५ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर, आमदार, खासदार देणाऱ्या ह्या शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकी आधी सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले. माजी आमदार , जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नाममात्र उरली. सध्या राष्ट्रवादीत सक्षम असा चेहरा वा नेतृत्व नाही, हे देखील तितकेच खरे आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर तसेच व्यक्तिगत हित पाहून माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसुरे आदी अनेक जण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. तर काहींच्या नावाची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी देखील कदम, पाटील आदीं मध्ये चुरस लागली आहे. हे सर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत. 

महामंडळचे अध्यक्ष पद, विरोधीपक्ष नेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पद आदी अनेक पदे राष्ट्रवादीमध्ये मिळून देखील २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्ष सोडून भाजपात गेलेले आसिफ शेख सुद्धा राष्ट्रवादीत परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यां कडे साखरपेरणी करत आहेत . त्यामुळे अडचणीच्या पडत्या काळात स्वतःच्या स्वार्था साठी राष्ट्रवादी सोडून अन्यत्र पळ काढणाऱ्या ह्या पळपुट्याना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून होत आहे. त्याचे पडसाद चाकणकर यांनी घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी देखील दिसून आले . 

चाकणकर म्हणाल्या की , "पक्ष सोडून गेलेल्यांऐवजी पक्षासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार. महिला आघाडीत तरी हाच निर्णय. पुन्हा आले तर त्यांना आधी कार्यकर्ता म्हणून कामे करण्यास सांगणार. त्यांनी पदांसाठी गडबड करू नये. आज निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. पक्ष संघटना म्हटली की बेरजेचे गणित असते. त्यामुळे पक्षात नव्याने आणि पुन्हा येणारे ही प्रक्रिया सुरूच असते. पदे द्यायला उशीर झाला, कारण कोरोना संसर्गाचे संकट होते व अजूनही कायम आहे."

याचबरोबर, पदे येतात - जातात. पदे आणखी काही महिन्यांनी वाटली तरी चालतील . काही फरक पडणार नाही. पण महाराष्ट्रवरील कोरोनाचा संकट दूर करणे महत्वाचे. मधली पाच वर्ष सत्तेत नव्हतो, आता सत्तेत आहोत. त्यामुळे आमदार - खासदार वाढतील. येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी पक्षाचे पौर्णिमा काटकर , संतोष पेंडुरकर , साजिद पटेल , सुप्रिया माईणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस