शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:55 IST

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोनिया गांधींनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकारनं अनेक संस्थांना संपवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास संविधानाला पूर्वीसारखंच गतवैभव प्राप्त करून देऊ, काही जणांना देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात आहे. विचारांच्या आधारवर स्वतःच्याच देशातल्या नागरिकांशी भेदभाव करत आहेत.काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, अशी परिस्थिती येणार आहे. गेल्या काही काळापासून आपल्या देशातील मूळ आत्म्याला एका विचारधारेच्या आडून तुडवलं जातंय. ज्या संस्थांना आम्ही प्रगतिपथावर आणून मजबूत केलं, त्या सर्वांनाच मोदी सरकारनं जवळजवळ संपवल्यात जमा आहे. 65 वर्षात मेहनत करून तयार केलेल्या जनकल्याणाच्या मूल संरचना भाजपानं संपवण्याचं काम केलं आहे.

आज देशभक्तीची नवी परिभाषा शिकवली जातेय. देशातील विविधता स्वीकार न करणाऱ्यांना देशभक्त म्हटलं जातंय. धर्म आणि विचारधारेच्या आधारवर देशातील नागरिकांमध्ये करण्यात येत असलेल्या भेदभावाला मोदी सरकार योग्य ठरवत आहे. देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असून, मोदी सरकारला ती रुळावर आणायची नसल्याची टीका सोनियांनी केली आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटं बोलत आहेत.

भाजपाच्या पाच वर्षातल्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. ते म्हणतात, नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी तुम्ही काय केलं?, पाच वर्षांत देशातील कोणती कामं केली?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्या म्हणाल्या, स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणं ठोकतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधी