शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गेले ‘ते’ दिवस राहिल्या ’त्या’आठवणी.. अशा सभा पुन्हा होणे नाही..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:02 IST

हल्ली त्या सभा फक्त एक आठवण होवून राहिल्या आहेत.ती गर्दी,तो उत्साह,, लगबग, सगळं वातावरण कसे भारलेले असत..

 - दीपक कुलकर्णी - 

पुणे: निवडणुका म्हटल्या की पक्ष आले .. आणि पक्ष आले की नेत्यांच्या सभा आल्या.. या सभांचा चौरंगी इतिहासात काही नेत्यांच्या सभांनी गर्दीचे उच्चांक गाठत अनेक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केले आहे.. आणि काही मातब्बर राजकीय नेते तर त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीच्या उच्चाकांमुळेच ओळखले जातात. त्यात पंडित जवाहरलाल नेहरु, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी,असे ही झाली जुन्या पिढीतील काही नावे .. आणि अगदी अलिकडचे म्हणालात तर राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले, राहुल गांधी, कन्हैय्या कुमार असे काही लक्षणीय नावे..या नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी ही त्या भाषणशैली, व्यक्तिप्रेम, पक्षप्रेम या अनुषंगाने येत असली तरी त्यांच्या सभांना होणारी तुफान गर्दी लक्षवेधी ठरणारी आहे. त्या सभांशी संबंधित काही आठवणी, रंगतदार किस्से आजदेखील बुजुर्गांच्या डोळ्यांसमोर ठळकपणे तरळताना दिसतात.  गाजलेल्या सभांचे क्षेत्र फक्त मुंबई , पुणे पुरते मर्यादित नव्हते.. देशाच्या कानाकोपरा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणाने , सभांमधील फटकेबाजीने नुसता धुमसत असायचा.. पण या धामधुमीत प्रत्येकाचा असा एक पॉलिटिकल आयकॉन ठरत.. ज्याच्या प्रेमापायी काहींनी आपले आयुष्य त्याच्या पक्षाला , विचारांना  वाहिले आहे.. त्यातूनच आज माहीर काही राजकीय नेते घडलेले आहे.. कधी कुणा नेत्यातील आक्रमकता तर कुणाची विनम्रता, तसेच त्यांनी वेळोवेळी जपलेले सामाजिक बांधिलकीचे योगदान अशी विविध कारणे या होणाऱ्या गर्दीला पाठीमागे असतील. पण सगळ्याचा पाया होता ती म्हणजे पक्षनिष्ठा..जुन्या काळात पक्षनिष्ठा, व्यक्तिप्रेम, साधेपणा, या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व होते.. सभेच्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जमिनीवर मांडी घालून केलेले झुणका भाकरीचे साधे जेवण ही दीर्घकाळ आठवण मनावर कोरुन जात असत. त्यावेळी कुठे होते हो फाईव्ह स्टार हॉटेल्स, लॉज वगैरे.. अशाच प्रसंगातून मग कार्यकर्ते आपले कुटुंब, रोजी रोटी सोडून ‘साहेबां ’साठी तहान भूक विसरत पायाला भिंगरी लावून पळण्यापासून ते वाट्टेल ते करण्यापर्यंत एका हाकेवर तयार असत..पण हल्ली अशी पक्षनिष्ठा असलेले नेतेच दुर्मिळ होत चालले आहे तर कार्यकर्त्यांची बात लाखो कोसो दूरच...अजूनसुध्दा मनापासून झटणारे कार्यकर्ते असतील..ही गर्दी अशा कार्यकर्त्यांची होती.. पण मला आठवतंय माझ्या लहानपणी राजकीय सभांना ऐकण्यासाठी काही किलोमीटर सायकलसह मिळेल त्या वाहनाने किंवा चालतही जात असत..

परंतु, हल्ली त्या सभा फक्त एक आठवण होवून राहिल्या आहेत. ती गर्दी,तो उत्साह,, लगबग, सगळं वातावरण कसे भारलेले असत.. या सभांमधील त्या भाषणांचा किंवा नेत्यांचा ज्वर पुढील काही दिवस उतरत नसत. सध्याच्या परिस्थितीत सभा होतात पण कधी नेत्यांच्या आगमनाला होणारा अतिउशीर, स्टार प्रचारकांच्या माथी असलेला भरगच्च कार्यक्रम..त्यानंतर सुरु झालेली चालणारी रटाळ आणि लांबलचक प्रस्तावना, मनोगते असे सारं सोपस्कर पार पडल्यावर काही तासाने होते नेत्यांचे भाषण. तेही पुढील दौऱ्यामुळे आटोपतेच.. त्यातील मुद्दे , टीका यांची गणती तर किरकोळीतच... सर्वच पक्ष आणि नेत्यांच्या बाबतीत कदाचित हे अनुमान बरोबर असेल असेही नाही. या प्रकारच्या बेरंग सभांचे अधिक असणार हे सत्य आहेच. त्या काळात होणाऱ्या टीका ही खिलाडूवृत्तीने घेतल्या जात.. किंवा एक राजकीय वयोमर्यादा यांचे भान बाळगले जात. नेहमी राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद किंवा व्यक्तिद्वेष भरलेला नसत... बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची तर गंमतच न्यारी होती. ते कधीच लिहून भाषण करत नसत. उत्स्फूर्त आणि ताज्या घडामोडींवर जळजळीत भाष्य करणारे त्यांच्या भाषणाची दुसऱ्या दिवशी तुफान चर्चा झाल्याशिवाय राहत नव्हते. अनेक नेते असे होते की त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी लोक कानात प्राण ऐकून बसत.. हल्ली भाषणे अभ्यासपूर्ण असतात, काही नेत्यांच्या सभांना गर्दीही भरपूर होते. पण ही गर्दी ‘मॅनेज’असल्याची ‘सॉफ्ट’चर्चा कानावर पडते.. तेव्हा एकच वाक्य बाहेर येते ते म्हणजे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. अशा सभा पुन्हा होणे नाही...

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक