शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

"...तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 15:55 IST

सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या  अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनावश्यक बोलत आहेत, महाजन अहवाल अंतिम असून सीमाप्रश्न कधीच सुटलेला आहेकदाचित मुख्यमंत्री ठाकरेंना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहेराजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे विधाने सुरू आहेत

बंगळुरू – सीमाभागातील हुताम्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून कर्नाटकच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटकातउद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे त्या राज्याचे गृहमंत्री बसवराज बोंमई महाराष्ट्राला पोकळ धमक्या देत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात बोंमई यांनी सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय.

याबाबत बंगळुरू येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, तेव्हा गृहमंत्री बसवराज बोंमई म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर आमची बाजू कोर्टात सिद्ध झाली आहे, आमच्या राज्याची भूमी आम्ही सोडणार नाही. तर महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते भाग कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेळगावातील मराठी भाषिकांनी शांत राहण्याचा प्रयत्न करावा, ते कर्नाटकाचे आहेत असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनावश्यक बोलत आहेत, महाजन अहवाल अंतिम असून सीमाप्रश्न कधीच सुटलेला आहे. संसदेनेही महाजन अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे उगाच या विषयावर वादग्रस्त विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेळगावात कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी विधाने करू नयेत. कदाचित मुख्यमंत्री ठाकरेंना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहे, राजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे विधाने सुरू आहेत. सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या  अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा काय म्हणाले?   

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरेंचे विधान दुर्दैवी आहे. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. या बाजूची(कर्नाटक) एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले, यावेळी कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत असं ट्विट त्यांनी केलं होतं, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास नगरविकास आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे