शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

"...तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 15:55 IST

सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या  अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनावश्यक बोलत आहेत, महाजन अहवाल अंतिम असून सीमाप्रश्न कधीच सुटलेला आहेकदाचित मुख्यमंत्री ठाकरेंना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहेराजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे विधाने सुरू आहेत

बंगळुरू – सीमाभागातील हुताम्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून कर्नाटकच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटकातउद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे त्या राज्याचे गृहमंत्री बसवराज बोंमई महाराष्ट्राला पोकळ धमक्या देत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात बोंमई यांनी सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय.

याबाबत बंगळुरू येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, तेव्हा गृहमंत्री बसवराज बोंमई म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर आमची बाजू कोर्टात सिद्ध झाली आहे, आमच्या राज्याची भूमी आम्ही सोडणार नाही. तर महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते भाग कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेळगावातील मराठी भाषिकांनी शांत राहण्याचा प्रयत्न करावा, ते कर्नाटकाचे आहेत असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनावश्यक बोलत आहेत, महाजन अहवाल अंतिम असून सीमाप्रश्न कधीच सुटलेला आहे. संसदेनेही महाजन अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे उगाच या विषयावर वादग्रस्त विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेळगावात कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी विधाने करू नयेत. कदाचित मुख्यमंत्री ठाकरेंना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहे, राजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे विधाने सुरू आहेत. सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या  अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा काय म्हणाले?   

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरेंचे विधान दुर्दैवी आहे. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. या बाजूची(कर्नाटक) एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले, यावेळी कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत असं ट्विट त्यांनी केलं होतं, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास नगरविकास आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे