शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:35 IST

माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?

ठाणे - माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या आव्हानाला मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले की, येत्या दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना उचलून दाखवा अशी भाषा माजी महापौर करत असतील तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री होणारे का? गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - मनसे या दोन्ही पक्षांचा सोशल मीडिया वॉर सुरू आहे.दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. जाधव यांच्यावर शनिवारी शिवसेनेचे खा. राजन विचारे आणि आ. प्रताप सरनाईक यांनी हल्लाबोल केला तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाधव यांच्या टीकेला निदर्शनाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले. माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?मी जे म्हणालो ते सेनेतील हुशार मंडळींनी समजून घेतलेले नाही. ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले त्यांना जेव्हा कधी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा त्यांना उचलून जेलमध्ये टाकू आणि माझ्या या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी काय म्हणालो हे जनतेला कळत आहे पण शिवसेनेतील नेत्यांना नीट समजून घ्यायचे नाही. मी 13 ऑगस्ट रोजी सकाळी हे वाक्य बोललो त्यावर प्रतिक्रिया द्यायला शिवसेनेला दोन दिवस का लागले. दोन दिवसात त्यांच्यातील राग तयार होत नव्हता का? त्यांना हे बोलायला कोणीतरी लावत आहे आणि शिवसेना स्वतःचे हसू करून घेत आहे. येत्या दोन दिवसांत उचलून दाखवा असे माजी महापौर म्हणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत राजीनामा द्यावा आणि राज यांनी त्यांचा पदभार स्वीकारावा मग आम्ही पुढे करूच सगळे.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाthaneठाणेPoliticsराजकारण