शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:54 IST

आज होणार सुनावणी, रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे

तिरुअनंतपुरम : भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांचे आणि सहयोगी पक्ष एआयएडीएमके उमेदवाराचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले. भाजप आघाडीच्या तिघांचे अर्ज नामंजूर केल्याने या आघाडीस धक्का बसला आहे. याविरोधात या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता यावर पुढील सुनावणी होईल. एन. हरिदास आणि निवेदिता यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत न्यायमूर्ती एन. नागेश यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी छाननीनंतर या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले होते.कन्नूर जिल्ह्यातील थॅलेसेरी मतदारसंघात, त्रिशूरमधील गुरुवायूरमध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील देवीकुलम या मतदारसंघात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नामंजूर केले.

थॅलेसेरीमध्ये भाजपने कन्नूरचे जिल्हाध्यक्ष एन. हरिदास यांना उमेदवारी दिली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने या मतदारसंघात २२,१२५ मते मिळविली होती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची स्वाक्षरी नसल्याचे सांगून हरिदास यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. गुरुवायूरमध्येही एनडीए उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. येथील उमेदवार, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिता यांनी उमेदवारी अर्जात प्रदेशाध्यक्षपदाचे नाव नमूद न केल्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली.

माकपने काय केला आहे आरोप? 

देविकुलममध्ये एआयएडीएमकेचे उमेदवार, केरळमधील एनडीएचे सहयोगी सहकारी धनलक्ष्मी यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. २६ क्रमांकाचा फॉर्म भरला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आला.भाजपचे कन्नूरचे जिल्हाध्यक्ष, थॅलेसेरी मतदारसंघातील उमेदवार एन. हरिदास आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, त्रिशूरमधील गुरुवायूरच्या उमेदवार निवेदिता सुब्रह्मण्यम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी नामंजूर करणे हा भाजप आणि कॉंग्रेसमधील छुप्या कराराचा भाग असल्याचा आरोप माकपने केला आहे. दुसरीकडे, केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माकप आणि भाजपमधील हातमिळवणी समजून घेत उमेदवारी अर्ज फेटाळल्याचा आरोप केला. 

टॅग्स :BJPभाजपाTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१