शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:54 IST

आज होणार सुनावणी, रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे

तिरुअनंतपुरम : भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांचे आणि सहयोगी पक्ष एआयएडीएमके उमेदवाराचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले. भाजप आघाडीच्या तिघांचे अर्ज नामंजूर केल्याने या आघाडीस धक्का बसला आहे. याविरोधात या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता यावर पुढील सुनावणी होईल. एन. हरिदास आणि निवेदिता यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत न्यायमूर्ती एन. नागेश यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी छाननीनंतर या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले होते.कन्नूर जिल्ह्यातील थॅलेसेरी मतदारसंघात, त्रिशूरमधील गुरुवायूरमध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील देवीकुलम या मतदारसंघात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नामंजूर केले.

थॅलेसेरीमध्ये भाजपने कन्नूरचे जिल्हाध्यक्ष एन. हरिदास यांना उमेदवारी दिली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने या मतदारसंघात २२,१२५ मते मिळविली होती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची स्वाक्षरी नसल्याचे सांगून हरिदास यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. गुरुवायूरमध्येही एनडीए उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. येथील उमेदवार, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिता यांनी उमेदवारी अर्जात प्रदेशाध्यक्षपदाचे नाव नमूद न केल्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली.

माकपने काय केला आहे आरोप? 

देविकुलममध्ये एआयएडीएमकेचे उमेदवार, केरळमधील एनडीएचे सहयोगी सहकारी धनलक्ष्मी यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. २६ क्रमांकाचा फॉर्म भरला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आला.भाजपचे कन्नूरचे जिल्हाध्यक्ष, थॅलेसेरी मतदारसंघातील उमेदवार एन. हरिदास आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, त्रिशूरमधील गुरुवायूरच्या उमेदवार निवेदिता सुब्रह्मण्यम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी नामंजूर करणे हा भाजप आणि कॉंग्रेसमधील छुप्या कराराचा भाग असल्याचा आरोप माकपने केला आहे. दुसरीकडे, केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माकप आणि भाजपमधील हातमिळवणी समजून घेत उमेदवारी अर्ज फेटाळल्याचा आरोप केला. 

टॅग्स :BJPभाजपाTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१