शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर”; भाजपाची बोचरी टीका

By प्रविण मरगळे | Updated: October 6, 2020 14:52 IST

Sushant Singh Rajput, BJP, Home Minister Anil Deshmukh News: भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, भाजपाची मागणी

ठळक मुद्देआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाऊंटचा आरोप केला आहेमहाराष्ट्राची बदनामी दुसरं कोणी करत नसून  राज्यातील महाविकास आघाडीच करतेयमहाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय गृहमंत्री इतके बेजबाबदार कधीही पाहिले नाही - भाजपा

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका करत तुम्ही गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंट उघडण्याचा प्रकार समोर आल्यावर त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष निशाणा बनवलं.

यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाऊंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा असा घणाघात केला आहे. याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर राजकीय खोटे आरोप केले, अनिल देशमुखांच्या आरोपाचा आम्ही तीव्र निषेध करतो, तुम्हाला जी चौकशी करायची ते खुशाल करा, भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाही, करत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच हेच अनिल देशमुख यांनी पूर्वी सांगितलं होतं, भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, महाराष्ट्राची बदनामी दुसरं कोणी करत नसून  राज्यातील महाविकास आघाडीच करतेय, राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्यावं, पुण्यात गोळीबार झाला त्याकडे लक्ष द्यावं, महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय गृहमंत्री इतके बेजबाबदार कधीही पाहिले नाही अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली.

काय म्हणाले होते अनिल देशमुख?

बिहार निवडणुकीमुळे भाजपाने सुशांत प्रकरणावर राजकारण केले. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. यावरून हे सिद्ध होते की मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य होता. सुशांत प्रकरणात आता सत्य समोर आले आहे. सुशांतच्या नावाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. याशिवाय मुंबई पोलिसांचीही बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासणी अहवालाबद्दल खोटी अफवा पसरवली, यामागे कोण होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. खोटे बोलण्यामागे भाजपाचा हात आहे. या विषयावर भाजपाने थोडे राजकारण केले. बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून हा मुद्दा फक्त भाजपानेच लावला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की, ते महाराष्ट्रात मतभेद आणणार्‍या गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी डीजीपी) यांच्यासाठी प्रचार करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.   

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbai policeमुंबई पोलीस