शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आयोगाच्या कारवाईने सुप्रीम कोर्ट समाधानी; मायावतींना दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:32 IST

निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली : प्रचारात प्रक्षोभक आणि विखारी भाषणे करून निवडणुकीचे नि:ष्पक्ष वातावरण गढूळ करणाऱ्या राजकीय नेत्यांना आवर घालण्यासाठी आम्ही फारसे काही करू शकत नाही, असे सांगणा-या निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.सोमवारी रात्री आयोगाने आझम खान यांच्यावर ७२ तास व मनेका गांधी यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली. हे दोघे निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वत:चा प्रचार करणेही शक्य होणार नाही.

सोमवारी एका याचिकेच्या निमित्ताने हा विषय सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उपस्थित झाला, तेव्हा आयोगाने हतबलता दाखविल्यावर न्यायालयाने आयोगाच्या अधिकारांची व्याप्ती मंगळवारी तपासून पाहण्याचे ठरविले होते, परंतु त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली. त्यामुळे सरन्यायाधीशांनी ‘आयोगाला हरवलेले अधिकार सापडलेले दिसतात!’ असा शेरा मारून केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक