शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आयोगाच्या कारवाईने सुप्रीम कोर्ट समाधानी; मायावतींना दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:32 IST

निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली : प्रचारात प्रक्षोभक आणि विखारी भाषणे करून निवडणुकीचे नि:ष्पक्ष वातावरण गढूळ करणाऱ्या राजकीय नेत्यांना आवर घालण्यासाठी आम्ही फारसे काही करू शकत नाही, असे सांगणा-या निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.सोमवारी रात्री आयोगाने आझम खान यांच्यावर ७२ तास व मनेका गांधी यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली. हे दोघे निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वत:चा प्रचार करणेही शक्य होणार नाही.

सोमवारी एका याचिकेच्या निमित्ताने हा विषय सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उपस्थित झाला, तेव्हा आयोगाने हतबलता दाखविल्यावर न्यायालयाने आयोगाच्या अधिकारांची व्याप्ती मंगळवारी तपासून पाहण्याचे ठरविले होते, परंतु त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली. त्यामुळे सरन्यायाधीशांनी ‘आयोगाला हरवलेले अधिकार सापडलेले दिसतात!’ असा शेरा मारून केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक