शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकांच्या धसक्याने सपा-बसपा, भाजपाच्या रणनीतीत होतील बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:10 IST

प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविल्यामुळे भाजपा व मित्रपक्ष आणि विरोधातील सपा-बसपा आघाडी यांना लोकसभा निवडणुकांत आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागतील असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

लखनौ : प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविल्यामुळे भाजपा व मित्रपक्ष आणि विरोधातील सपा-बसपा आघाडी यांना लोकसभा निवडणुकांत आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागतील असे राजकीय निरीक्षकांना वाटते. प्रियंका यांना सक्रिय राजकारणात उतरविण्याचा निर्णय खूपच उशीरा घेतला असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. प्रियंका यांचे व्यक्तिमत्व त्यांची आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळतेजुळते आहे.जनतेवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पडणारा प्रभाव, लोकांशी संवाद साधण्याची शैली या गोष्टींचा काँग्रेसला फायदा होईल. इतर पक्षांनी जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणाची केलेली जुळवाजुळव उधळून लावण्यात काँग्रेसला यश मिळेल असेही काही नेत्यांचे मत आहे.लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला वगळून उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपाने आघाडी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या ८० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केला. पण प्रियंकांना राजकीय मैदानात उतरवून काँग्रेसने मोठा धक्का दिला. काँग्रेस खरोखर ८0 जागा लढवणार की ठराविक ३0 ते ५0 जागांवर उमेदवार देणार, हे स्पष्ट व्हायचे आहे. काँग्रेस जितकी क्षीण होईल तितके आपण प्रबळ होऊ हे प्रादेशिक पक्षांना नीट ठाऊक आहे. राज्यात २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसतर्फे केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी हेच विजयी झाले होते.सपा-बसपाला मुस्लीम मतदार काँग्रेसकडे वळू नयेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. ब्राह्मणांसहित इतर सवर्ण जाती तसेच दलितांची मते काँग्रेस वा भाजपाकडे न जाता, आपल्याकडेच राहातील याकडेही लक्ष द्यावे लागेल. सवर्णांतील आर्थिक दुर्बलांना भाजपाने १० टक्के आरक्षण दिले असले तरी तो समाज आपली पाठराखण करेलच याची भाजपाला खात्री वाटत नाही. त्यातच प्रियंकांच्या राजकारण प्रवेशामुळे भाजपा, सपा, बसपापुढे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Priyanka Chopraप्रियांका चोप्राLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९