शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार 'ओबीसीं'च्या विरोधात - हंसराज अहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:01 IST

State's Maha Vikas Aghadi government against 'OBCs' - Hansraj Ahir : राज्यातील महाविकास आघाडी सरकार ''ओबीसी'' विरोधात काम करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपचे नेते हंसराज अहिर यांनी मंगळवारी येथे केला.

अकोला: महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गाचे (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ''ओबीसी'' विरोधात काम करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपचे नेते हंसराज अहिर यांनी मंगळवारी येथे केला.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद , पंचायत समित्या, ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ''ओबीसी'' चे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने चौदा महिन्यांचा वेळ दिल्यानंतरही राज्य सरकारने ओबीसी आरक्षणसंदर्भात निर्णय न घेतल्याने ,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केला असून, राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करीत आहे, असा आरोप अहिर यांनी केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने अध्यादेश काढला होता व त्याला विधान सभेत मान्यता देण्यात आली होती.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले असून, २७ टक्के आरक्षणही मिळत नसल्याचे अहिर यांनी सांगितले. केंद्र शासनामार्फत जातीनिहाय जनगणना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, रवी गावंडे, माधव मानकर, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध २६ जून रोजी ''रस्ता रोको'' आंदोलन!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध भाजपच्यावतीने २६ जून रोजी राज्यात ''रस्ता रोको'' आंदोलन करण्यात येणार अडल्याची माहिती हंसराज अहिर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणHansraj Ahirहंसराज अहिरBJPभाजपाAkolaअकोला