शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 20:56 IST

Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही, कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबई : मेट्रो कारशेडबाबत सातत्याने निर्णय बदलत वाहतुकीच्या समस्यांनी बेजार झालेल्या मुंबईकरांच्या अडचणीत राज्य सरकारने वाढ केली आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडचा काम हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अंधेरीच्या मेट्रो रेल्वे स्टेशन समोर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. 800 एकर आरे जंगल वाचविण्याचा दावा जागोजागी होर्डिंग लावून सरकारद्वारे केला जात आहे. मात्र सरकारच्या या दाव्याची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे. या मोर्चाला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली.

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, गोरेगावच्या आरे येथील कारशेड प्रकल्प बाबतच्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या होत्या व त्यानंतर तो प्रकल्प तिथेच केला जाणार हे नक्की होतं. परंतु ठाकरे सरकारने अहंकाराच्या भावनेतून कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांसाठी सर्वाधिक प्राधान्याचा विषय वाहतूक आहे. मुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबईकरांच्या या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिवस-रात्र एक करून या प्रकल्पावर काम केले होते. अरे येथे मेट्रो कार शेडचा निर्णय योग्य असताना देखील  सध्याचे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो प्रकल्प आधी पहाडी आणि नंतर कांजूरमार्ग च्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या जागेवर स्थलांतरित केला. या जमिनीवर असलेली लिटिगेशन सोडवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता जास्त आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. 

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाAarey ColoneyआरेMumbaiमुंबई