शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 20:56 IST

Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देमुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही, कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबई : मेट्रो कारशेडबाबत सातत्याने निर्णय बदलत वाहतुकीच्या समस्यांनी बेजार झालेल्या मुंबईकरांच्या अडचणीत राज्य सरकारने वाढ केली आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडचा काम हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अंधेरीच्या मेट्रो रेल्वे स्टेशन समोर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. 800 एकर आरे जंगल वाचविण्याचा दावा जागोजागी होर्डिंग लावून सरकारद्वारे केला जात आहे. मात्र सरकारच्या या दाव्याची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे. या मोर्चाला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली.

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, गोरेगावच्या आरे येथील कारशेड प्रकल्प बाबतच्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या होत्या व त्यानंतर तो प्रकल्प तिथेच केला जाणार हे नक्की होतं. परंतु ठाकरे सरकारने अहंकाराच्या भावनेतून कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांसाठी सर्वाधिक प्राधान्याचा विषय वाहतूक आहे. मुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात  प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबईकरांच्या या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिवस-रात्र एक करून या प्रकल्पावर काम केले होते. अरे येथे मेट्रो कार शेडचा निर्णय योग्य असताना देखील  सध्याचे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो प्रकल्प आधी पहाडी आणि नंतर कांजूरमार्ग च्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या जागेवर स्थलांतरित केला. या जमिनीवर असलेली लिटिगेशन सोडवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता जास्त आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. 

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाAarey ColoneyआरेMumbaiमुंबई