शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 09:56 IST

फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत.

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. भाजपलादेखील पडद्यामागील हालचालींतून काही सकारात्मक निष्कर्ष निघेल याची खात्रा नाही.“विरोधकांनी सभागृहात येऊन चर्चेत सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते; परंतु ते दूर पळत आहेत. तथापि, त्यांना यातून काहीही मिळणार नाही”, असे भाजपचे लोकसभेतील प्रमुख प्रतोद (व्हीप) राकेश सिंह यांनी त्यांच्याशी रविवारी संपर्क साधल्यावर सांगितले. केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी, “काँग्रेस हा हेरगिरीचा तर जेम्स बाँड होता,” असा आरोप केला. ते म्हणाले, “इतर काही विरोधी पक्षांचे धोरण हे आरोप करून पळून जायचे असे आहे.”राज्यसभेतील नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हे सभागृहातील कोंडी दूर करण्यासाठी काही विरोधी नेत्यांच्या संपर्कात आहेत.  या प्रयत्नांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे; परंतु काही खासदारांचे मत असे की, कोंडी दूर करण्यासाठी मध्यम मार्ग काढण्यासाठी कदाचित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे योग्य नेते आहेत. या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा