शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Adhir Ranjan Chaudhary: अधीर रंजन यांचा पत्ता कट होणार?; सोनिया गांधी लोकसभेत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 11:06 IST

Adhir Ranjan Chaudhary, Sonia Gandhi: अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने लॉबिंग केल्याचे समजते आहे. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या बहरामपूर येथून खासदार आहेत. ते विधानसभेला काँग्रेसचा चेहरा होते, तसेच प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. महत्वाचे म्हणजे अधीर रंजन हे काँग्रेसमधील जी-२३ या बंडखोर गटाचे विरोधक आहेत.

ठळक मुद्देअधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने लॉबिंग केल्याचे समजते आहे. लोकसभेत काँग्रेसचे नेतेपदाच्या शर्यतीत शशी थरुर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहेत.पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मनीष तिवारी यांना पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवू इच्छित आहेत. 

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पक्षाचा नेता बदलला जाऊ शकतो. अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chaudhary) यांना हटवून त्यांच्याजागी अन्य नेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, या काळातच हा निर्णयदेथखील होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे. (Adhir Ranjan Chaudhary may lost his congress Lok Sabha leader post before monsoon session of Parliament.)

अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने लॉबिंग केल्याचे समजते आहे. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या बहरामपूर येथून खासदार आहेत. ते विधानसभेला काँग्रेसचा चेहरा होते, तसेच प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. महत्वाचे म्हणजे अधीर रंजन हे काँग्रेसमधील जी-२३ या बंडखोर गटाचे विरोधक आहेत. जेव्हा या नेत्यांनी सोनिया गांधींनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पत्र लिहिले होते, तेव्हा अधीर रंजन हे त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते. 

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार अधीर रंजन चौधरी यांना लोकसभा गटनेते पदावरून हटविण्याच्या निर्णयामागे तृणमूल सोबतच चांगले संबंध बनविण्याचे पाऊल आहे. तसेच भाजपा विरोधी मोहिमेमध्ये समन्वय राखणे हा देखील उद्देश आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करत तृणमूलविरोधात लढली होती. दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ममता यांच्यावर टीका न करण्याची भूमिका घेतली होती. नंतर तृणमूलच्या विजयाचे स्वागतही केले होते. 

लोकसभेत काँग्रेसचे नेतेपदाच्या शर्यतीत शशी थरुर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बंडखोर नेत्यांच्या पत्रावर सह्या आहेत. जर या दोघांपैकी कोणा एकाची नियुक्ती झाली तर काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या वापसीच्या आधी गांधी घराण्याकडून आणखी एक प्रयत्न असे पाहिले जाईल. सुत्रांनुसार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मनीष तिवारी यांना पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवू इच्छित आहेत. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस