शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 00:24 IST

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही,

अलिबाग : सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे विकासावर बोलण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्याचमुळे ते जाहीर सभेत लोटांगण घालून माझ्यावर टीका करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील जाहीर सभेत केला.तालुक्यातील थळ, मापगाव, शहापूर आणि कुर्डूस येथील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडीतील घटक पक्ष असणाºया काँग्रेसने त्यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम आखला होता. त्यांनी या ठिकाणी प्रचार रॅली आणि झंझावती सभा घेतल्या. त्या सभांमधून तटकरे यांनी भाजप सरकार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने देशात काय केले, असा अपप्रचार भाजप आणि शिवसेना करत आहे. याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, विविध कंपन्या, शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य आयात करणारा अशी ओळख पुसून तो निर्यात करणारा देश अशी केली. संगणक, मोबाइल हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घेतलेले निर्णय आहेत. भाजप सरकारेन जनतेला फसवण्याचे काम केले आहे.

देशाला आज धर्मनिरपेक्ष विचारांची आणि सरकाची गरज आहे. देशात परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप सरकाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला नाही, त्यांच्या मालाला आधारभूत किंमत त्यांना देता आलेली नाही. पीक विम्यात भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
युतीचे उमेदवार गीते यांनी रायगड मतदारसंघात विकास केलेला नाही. दिवेआगर, मुरुड, माणगाव, गोरेगाव या ठिकाणी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड घेऊन तेथे फक्त सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम केले. मी आणलेला विकासनिधी त्यांनी आणल्याचे खोटे सांगण्याचा ‘उद्योग’ अवजड उद्योगमंत्र्यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गीतेंनी केलेली कामे मी दुर्बीण लावून शोधत असल्याची मार्मिक टीकाही त्यांनी केली.अवजड उद्योगमंत्री म्हणून काँग्रेसचे तत्कालीन दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर येथे तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणून तेथे कंपनी उभारली, तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गोंदियामध्ये कंपनी उभारून हजोरो बेराजगार तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र, गीते यांना ती किमया साधता आली नाही. त्यांनी फक्त रेल्वे आणण्याचे आणि रोहे आणि रत्नागिरी येथे पेपर इंडस्ट्री आणण्याच्या फक्त घोषणाच केल्या. आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेले नाहीत, असे असतानाही ते त्याच प्रकल्पग्रस्तांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मते मागत असल्याची टीका तटकरे यांनीकेली.१९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोटकंट्रोल असल्याने भाजप त्यांचे ऐकत होती, आता मात्र चित्र उलटे झाले आहे. शिवसेना भाजप सोबत फरफरटत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली, तर मोंदीना चौकीदार चोर आहे, असे संबोधल्याची आठवण त्यांनी करून दिली. भाजप सरकारच्या कालावधीत महिला, दलित यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. बेरोजगारांचा प्रश्न आकाशाला भिडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग, रेवस-रेड्डी सागरी मार्ग पूर्ण करण्याबाबत मंत्री असताना दिलेला शब्द खरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, सुनील थळे, राजा ठाकूर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते