शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 13:01 IST

Shivsena-BJP News: सामनातील अग्रलेखाविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई - काल शिवसेनाभवनासमोरशिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे मुंबईसह राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेबाबत दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. दरम्यान,  राममंदिराबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून लिहिण्यात आलेल्या ज्या अग्रलेखावरून हा वाद झाला. त्याविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे. (So We marched on Sena Bhavan against that front article; The BJP MLA Amit Satam stated the exact reason)

लोकमतच्या एका विशेष चर्चेमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन का केलं, याचं नेमकं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारची भाषा सामनामधून वारंवार वापरली जाते. पत्रकारिता ही वेगळी बाब. ही पत्रकारिता नाही. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे भाजयुमोचे कार्यकर्तेही आवेशात येतात. त्यामुळे वारंवार होणारे असे बिलो द बेल्ट हल्ले सुरू होते ते कुठेतरी भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले होते. तुम्ही एकदा लिहाल दोनदा लिहाल. मात्र दहाव्यांदा लिहिल्यावर अकराव्या वेळी कुठला ना कुठला कार्यकर्ता प्रतिक्रिया देणारच, असे अमित साटम यांनी सांगितले.

दरम्यान, शांततापूर्वक, लोकशाहीच्या मार्गाने भाजयुमोचा कार्यकर्ता त्याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेला होता. त्यांनी तिथे आंदोलन केलं. त्यांना अटक झाली. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी तीनचार कार्यकर्ते वेगळे उभे होते. त्यात एक महिला होती. तेव्हा उर्वरित कार्यकर्ते गेल्यानंतर पोलिसांच्या आडून ५०-६० जणांच्या जमावाने या तीन चार जणांवर हल्ला केला, ही वस्तुस्थिती आहे. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे कार्यकर्तेही आवेशात येतात. जसं यांना लागतं, तसं आमच्या लोकांनाही लागतं. गेल्या सहा सात वर्षांत शिवसेनेकडून होणारी टीका अनेकदा सहन केली आहे. शिवसेनेकडून सत्तेत असतानाही भाजपाच्या नेत्यांवर बिलो द बेल्ड हल्ले सुरू होते. मात्र अशी टीका होऊनही कार्यकर्ते शांत होते. मात्र कधीनाधील अशा संतापाचा उद्रेक होतो, तो काल झाला, असे भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.  

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईPoliticsराजकारण