शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"...म्हणून करण्यात आलं भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन,’’ नारायण राणेंनी सांगितलं नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:35 IST

Narayan Rane: आज करण्यात आलेल्या १२ आमदारांच्या निलंबनावरूनही नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग - कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्यावरून भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकासआघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. (BJP) एकीकडे स्वत:ला वाघ म्हणायचे आणि कोल्ह्यासारखे पळायचे, असा टोला नारायण राणे यांनी सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे. तसेच आज करण्यात आलेल्या १२ आमदारांच्या निलंबनावरूनही नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ("... So 12 BJP MLAs were suspended," Narayan Rane explained the exact reason)

राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. असे असताना राज्य सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन मुद्द्यापासून पळ काढत आहेत. अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जातो. मात्र त्यातूनही मुख्यमंत्र्यांनी पळ काढला. मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

दरम्यान, आज विधानसभेत झालेल्या राड्यानंतर करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनावरही नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. सरकार वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केले आहे. मात्र असे असले तरी सत्ताधाऱ्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही नारायण राणे यांनी केला.

विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनामुळे एक लाख ३० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांनाही त्याचं गांभर्य नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकीला जात नाहीत, पत्रकार परिषदा घेत नाहीत. विधिमंडळाचे अधिवेशनही अल्पकाळासाठी आयोजित केलं जात आहे. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा काय चालतो? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना