शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा भाजपाला घरचा अहेर

By admin | Updated: December 28, 2015 00:00 IST

बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भाजपावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे.निवडणूक लढवताना काही लोक गांधीजींच्या "साबरमती" सारखे असतात पण नंतर ते शरद पवारांच्या "बारामती"सारखे होतात. म्हणजेच निवडणुकीआधी साबरमती आता बारामती असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान ...

बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भाजपावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

निवडणूक लढवताना काही लोक गांधीजींच्या "साबरमती" सारखे असतात पण नंतर ते शरद पवारांच्या "बारामती"सारखे होतात. म्हणजेच निवडणुकीआधी साबरमती आता बारामती असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य भाजपा नेत्यांच्या बारामती भेटीवर लगावला आहे.

राज्य सरकार जर मस्तीत वागत असेल तर पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधल्या प्रचारसभेत भाजपाला दिली आणि राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असलो तरी संघर्षाची भूमिका कायम राहील असे संकेत दिले.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला ज्या राज्यात सक्षम नेतृत्व होते तिथे भाजपाला फारसे यश मिळाले नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सदासर्वकाळ निवडणूक जिंकण्याची जादू कोणाकडेच नसते असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

महागलेल्या तूरडाळीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारला उद्धव ठाकरेंनी पुन्हा लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या विधानाचा वापर करत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या ‘डायलॉग’प्रमाणेच ‘तूरडाळीच्या भावाचे काय झाले?’असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. स्मार्ट सिटी हा मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने नेमलेले अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री व भाजपचे इतर मंत्री ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसून हा रक्तदोष आहे अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

उद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत विचारला. स्वाती पिटलेच्या आत्महत्या प्रकरणावरुनही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत ही शरमेची बाब आहे असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष व सत्तेत भागीदार असलेल्या भाजपावर अनेकवेळा तोफ डागली. या संदर्भातली काही उदाहरणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक टीका केली आहे. काँग्रेसचे पंतप्रधान अचानक लाहोर किंवा कराचीत उतरले असते तर भाजपने त्यांच जंगी स्वागत केलं असतं का? असा खोचक सवालही अग्रलेखात विचारला आहे.