शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय

By प्रविण मरगळे | Updated: October 5, 2020 13:57 IST

Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवण्याची मागणीशिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना बिहारच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ८८ जागा लढवल्या आणि २ लाख ११ हजार मते मिळविली

मुंबई – बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे.

याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. जेडीयूला होणारं मतदान नकळत शिवसेनेला जाऊ शकतं. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक आणि प्रसिद्ध पक्ष नाहीत. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. नितीशकुमार यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही असं सूचित केले आहे.

या प्रकारावर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई म्हणाले की, बिहारमध्ये शिवसेनेला होणाऱ्या मतदानामुळे जेडीयू आणि त्यांचा मित्रपक्ष घाबरला आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं आहे. त्यामुळे आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं त्यांनी सांगितले.

२०१५ निवडणूक लढलेल्यांना मिळणार संधी

विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे शिवसेनेचे बिहार प्रदेशप्रमुख कौशलेंद्र शर्मा यांनी सांगितले. परंतु बिहारमधील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पक्ष आपला उमेदवार उभा करणार आहे. बर्‍याच जागांवर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाईल.

शर्मा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत नाव खराब असलेल्या उमेदवाराला उभे न करण्याच्या सूचना पक्षाच्या नेतृत्वाने केल्या आहेत. महिलांना निवडणुकीत अधिक तिकिट देण्यास सांगण्यात आले आहे. मागील निवडणुकीत पक्षाने ३ ते ४ महिला उमेदवार रिंगणात उतरले होते, परंतु यावेळी पक्ष महिलांना आणखी जास्त जागा देईल.

उद्धव आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक

शर्मा म्हणाले की आम्ही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पाटण्यात पत्रकार परिषद घेतील. शर्मा यांनी ५० जागांसाठी उमेदवारांची यादी शिवसेनेचे खासदार राऊत यांना दिली आहे. यातून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना बिहारच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ८८ जागा लढवल्या आणि २ लाख ११ हजार मते मिळविली.मात्र अनेक ठिकाणी शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं.

शिवसेनेचा निवडणूक अजेंडा

बिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, दुसरे चिन्ह घेऊन शिवसेना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. बिहार सरकारने मूळ प्रश्ना बाजूला ठेऊन सुशांत प्रकरणावरुन कसे राजकारण केले, हाच शिवसेनेच्या प्रचाराचा अजेंडा असेल, अशीही माहिती आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Shiv SenaशिवसेनाNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग