शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
2
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
3
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
4
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
5
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
6
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
7
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
8
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
9
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
10
'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
11
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
12
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
14
Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता
15
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
16
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
17
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
18
"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
19
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
20
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?

शिवसेना म्हणते, या निवडणुकीत कोणतीही लाट नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:16 IST

देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही.

नाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याचप्रमाणे २०१४च्या पूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाहीत. त्यामुळे पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचे मत शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले.नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरुवारी संवाद साधला. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छुक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते.निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी, पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्याचे बोलताना राऊत म्हणाले की, ‘मोदी ज्या राज्यात जाताततेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात जात, धर्माचा विषय तर येणारच.’ तसेच वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत