शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुछ तो गडबड है... शिवसेना शहरप्रमुख येताच शिवसेनेच्या आमदारांनी घेतला काढता पाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:03 IST

आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांसह डम्पिंगच्या ठिकाणावरून निघून गेल्यावर वातावरण काही प्रमाणात निवळलं

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहे. त्या आदेशानुसार शनिवारी आमदार आणि मुख्याधिकारी यांनी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली. ही पाहणी सुरू असतानाच त्या ठिकाणी शहरप्रमुख आल्याने काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. आमदारांची कोंडी करण्यासाठीच शहरप्रमुख याठिकाणी आल्याची चर्चा रंगू लागली. अखेर आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह डम्पिंगच्या ठिकाणावरून निघून गेल्यावर वातावरण काही प्रमाणात निवळले. 

शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झूम मीटिंगच्या माध्यमातून घेतली. या बैठकीला अंबरनाथ आणि बदलापूरच्या आमदारांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. न्यायालयाच्या समोरच डम्पिंग असल्याने न्यायालय सुरू होण्याआधी डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत तात्काळ पालिकेच्या आरक्षित डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरच कचरा टाकण्याचा आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शनिवारी नव्या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ हे सर्व अधिकार यांच्या समवेत गेले. नेमका कचरा टाकावा कुठे, याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर पोहोचले. ते येताच काही काळासाठी वातावरण स्तब्ध झाले होते. एवढेच नव्हे तर, शहरप्रमुखांनी इतर उपस्थित अधिकारी आणि पदाधिकारी यांना सज्जड दम भरताच आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून निघून जाण्यात धन्यता मानली. 

शिवसेना पक्षाचे आमदार असताना देखील आमदार आणि शहरप्रमुख यांनी एकत्रितपणे डंपिंग संदर्भात नियोजन करणे गरजेचे होते. मात्र एकमेकांना शह देण्याच्या संघर्षात डम्पिंगचा मूळ मुद्दा सोडून आमदारांना तिथून निघून जावे लागले. डम्पिंग ग्राउंडवर आमदार जागेची पाहणी करीत असताना शहरप्रमुख यांना विश्वासात घेतले नाही, याचा संताप व्यक्त करण्यासाठी वाळेकर डम्पिंग ग्राउंडवर आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिवसेनेच्याच शहरप्रमुखांकडे पाठ फिरवून आमदारांनी डम्पिंग ग्राउंड वरून निघून जाण्याचा निर्णय घेतल्यावर आमदार आणि शहर प्रमुख यांच्या राजकीय नात्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना