शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 08:49 IST

आदित्य ठाकरेंना भाजपवर निशाणा; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला सवाल

मुंबई: आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले, अशा शब्दांत पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. वैयक्तीक टीका करत ही मंडळी इतक्या खालच्या थराला जातील असा विचार मी कधीही केला नव्हता. आम्ही कधीही अशा प्रकारच्या टीका केली नाही. पण ठीक आहे. जनता सगळं पाहतेय, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलत होते.तुम्ही ज्यांच्यासोबत इतकी वर्षे एकत्र काम केलं, सरकार चालवलं, तेच आज तुमच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. ते आधीचं नातं संपलंय का? शिवसेना पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही का? राजकारणात कधीही कोणतंही वळण येऊ शकतं. तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं का?, असे प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आले. त्यावर आम्ही कधीही कोणाशीही शत्रुत्व पत्करलं नाही. कोणाशीही वैयक्तिक वैर पत्करून बदल्याच्या भावनेनं राजकारण केलं नाही, असं उत्तर आदित्य यांनी दिलं.'आम्ही कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीका केली नाही. आता समीकरणं बदलली आहेत. जिथे आम्हाला विश्वास मिळाला आहे, मैत्रीचा हात मिळाला आहे. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो, ते आम्हाला शत्रू समजू लागले आहेत आणि ज्यांना आम्ही विरोधी पक्ष समजत होतो, त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला आणि राज्याच्या विकासासाठी पुढे आले. हे एक नवं समीकरण आहे. आम्ही राज्य आणि देशाच्या कल्याणासाठी चांगलं काम करू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पीडीपी, जदयूसोबत युती करता, तेव्हा हिंदुत्व कुठे जातं?काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो. त्यावरून आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. 'भाजप जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करू शकतो. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो. भाजप अशा पक्षांसोबत युती करतो आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो. शिवसेनेत भावनेला महत्त्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा