शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"

By प्रविण मरगळे | Updated: January 6, 2021 14:18 IST

भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

ठळक मुद्देभातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नयेमुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना उद्धव ठाकरे यांनी आपलेपण दिले

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातल्याने आता राजकारण रंगू लागलं आहे, शिवसेनेकडून भाजपाचा पारंपारिक गुजराती मतदार खेचण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे, त्यासाठी शिवसेनेने जिलेबी मा फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं घोषवाक्य गुजराती भाषेत म्हणत गुजराती समाजाला आवाहन केलं आहे. 

शिवसेनेच्या या खेळीवर भाजपाने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भाजपाच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला आहे. तसेच गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले, १९९२-१९९३ च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवाना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी, मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले. आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शहा यांनी केला.  

त्याचसोबत भाजपाचे अतुल भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते म्हणे गुजराती मतदार सोडा मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही, भातखळकर तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे, बाबरी यांनी पाडली नाही, राममंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते आहे, देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही विसरलात त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे, भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

दरम्यान, भातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच आपडा वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे, गुजराती माणसाला ते आवडतात , तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्हीनंतर खोटी आश्वासन देऊन फसवता, मुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज आहे आणि त्याना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात, भाजपच्या पायाखालची वाळू गुजराती समाज सरकावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा हेमराज शहा यानी भाजपाला दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका