शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"

By प्रविण मरगळे | Updated: January 6, 2021 14:18 IST

भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

ठळक मुद्देभातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नयेमुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना उद्धव ठाकरे यांनी आपलेपण दिले

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातल्याने आता राजकारण रंगू लागलं आहे, शिवसेनेकडून भाजपाचा पारंपारिक गुजराती मतदार खेचण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे, त्यासाठी शिवसेनेने जिलेबी मा फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं घोषवाक्य गुजराती भाषेत म्हणत गुजराती समाजाला आवाहन केलं आहे. 

शिवसेनेच्या या खेळीवर भाजपाने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भाजपाच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला आहे. तसेच गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले, १९९२-१९९३ च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवाना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी, मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले. आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शहा यांनी केला.  

त्याचसोबत भाजपाचे अतुल भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते म्हणे गुजराती मतदार सोडा मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही, भातखळकर तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे, बाबरी यांनी पाडली नाही, राममंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते आहे, देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही विसरलात त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे, भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

दरम्यान, भातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच आपडा वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे, गुजराती माणसाला ते आवडतात , तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्हीनंतर खोटी आश्वासन देऊन फसवता, मुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज आहे आणि त्याना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात, भाजपच्या पायाखालची वाळू गुजराती समाज सरकावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा हेमराज शहा यानी भाजपाला दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका