शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

‘शिट्टी’ वाजणार नाही, बविआसाठी रिक्षाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:51 IST

शिट्टी हे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला बहुजन विकास आघाडीने दिलेले आव्हान फेटाळून लावत ते निवडणूक चिन्ह मुक्त करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नकार दिला

पालघर : शिट्टी हे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला बहुजन विकास आघाडीने दिलेले आव्हान फेटाळून लावत ते निवडणूक चिन्ह मुक्त करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नकार दिला. यावर पुन्हा निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी याबाबतची याचिका फेटाळल्याने लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला शिट्टी या त्यांच्या यापूर्वीच्या चिन्हावर न लढता नव्याने दिल्या गेलेल्या रिक्षा या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल.शिट्टी हे चिन्ह ताब्यात असलेल्या बहुजन महापार्टीच्या दोन उमेदवारांपैकी चेतन पाटील याचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान ग्राह्य धरल्याने राजू लडे हा दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिला. चेतन पाटील याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास शिट्टी या चिन्हावर दावा करण्याची रणनिती बहुजन विकास आघाडीने आखली होती. त्याचा सुगावा लागताच बहुजन महापार्टीने आपलाच उमेदवार चेतन पाटील याच्याविरोधात तक्रार करत त्याने पक्षाच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्याचा दावा केला. त्यानंतर शिट्टी चिन्ह मिळवण्यासाठी उच्च न्यायालय ते जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशी लढाई बविआने लढली. पण ते चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गोठवले. त्यावर फेरविचार याचिका सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सकाळी दाखल करण्यात आली. त्यावर भूमिका मांडण्यासाठी बहुजन विकास आघाडी आणि बहुजन महापार्टीचे वकील उपस्थित होते. या याचिकेत अन्य कुणालाही भाग घेण्याची संधी अथवा अनुमती नसताना निवडणूक निर्णय अधिकाºयांसमोरील खुर्चीत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि मागे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ उपस्थित होते. त्याला आक्षेप घेत बविआचे वकील अ‍ॅड. सुधीर गुप्ता यांनी लेखी तक्र ार नोंदवली.१२ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावेळी आणि चिन्हांच्या वाटपावेळी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात काय करीत होते? असा प्रश्न बविआने उपस्थित केला. निवडणूक निर्णय अधिकारी तणावाखाली नाही, तर दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी केला. चिन्ह वाटपाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एका मंत्र्याने निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या दालनात जाऊन दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास मोबाईल फोनवरून त्यांचे कुणाशी बोलणे करून दिले? याचा शोध पोलिसांनी घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणीही गुप्ता यांनी केली. सत्ताधाºयांच्या दबावाचा प्रभाव याचिकेच्या निर्णयावर पडल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बविआ आणि बहुजन महापार्टी यांच्यातर्फे झालेल्या युक्तिवादानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्याच प्रकरणातील फेरविचार याचिकेवर निर्णयाचा मला अधिकार नसल्याचे सांगत बविआचे सरचिटणीस उमेश नाईक यांच्यातर्फे दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.>निवडणूक निर्णय अधिकाºयांसमोर झालेल्या युक्तिवादादरम्यान मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र फाटक, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांची उपस्थिती आचारसंहितेचा भंग करणारी असून निवडणूक निर्णय अधिकारी तणावाखाली नाही, तर दबावाखाली काम करीत आहेत.- मनीषा निमकर, माजी राज्यमंत्री>संबंधित याचिकेच्या निर्णयाची कागदपत्रे (प्रोसेडिंग) पाहण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही राजकीय व्यक्तींना आहे. मात्र, ते त्यात भाग घेऊ शकत नाहीत. कुठल्याही कामानिमित्त भेट घेण्यासाठी मंत्री माझ्या दालनात येऊ शकतात.- डॉ. प्रशांत नारनवरे, निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर