शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

शिट्टीप्रकरणी ठाकुरांचा विरोधकांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:37 IST

या प्रकरणातील सहभागी असणा-यांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.

पालघर : बविआचे चिन्ह शिट्टी हिसकावून घेण्यात सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारण्यासाठी विमानाचा पास काढून ठेवावा असे सांगून या प्रकरणातील सहभागी असणाºयांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे शिट्टी चिन्ह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गोठविल्याने तीन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला वापरता येणार नसल्याने त्यांना पुन्हा रिक्षा याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची पाळी ओढवुु शकते. या कारणास्तव बविआ पक्षा कडून दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका ही पुन्हा फेटाळून लावण्यात आल्याने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि चिन्ह वाटपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाच्या आत आणि बाहेर कोण-कोण आले, आत गेले, बाहेर गेले, कोणाच्या दबावाखाली काम सुरू होते याबाबतचे पुरावे मिळविण्याचे काम सध्या सुरू असून सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार असल्याचे आ. ठाकुरांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात एवढा नाठाळपणा केला जात असेल तर मग प्रत्यक्ष निवडणुकीत किती करणार असे सत्ताधाºयांच्या हस्तक्षेपाबद्दल सांगून सध्या पुरावे गोळा करतोय नंतर ठोकू असेही त्यांनी सांगितले. मी म्हणजे कुणीही येऊन हाकायला गरीब गाय नसून दूध देणारी मारकुंडी गाय आहे असा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी इथे दिलेले निर्णय कुठल्यातरी मंत्र्यांच्या दबावाखाली दिले मात्र, पुढे कसे देतात ते बघू असा इशाराही त्यांनी दिला. आरडीसीसह अनेकांना दिल्लीचा पास काढून चकरा मारायला तयार रहावे असा इशारा मी दिला असून याना मी अजिबात सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.>तांत्रिक प्रक्रियाच बाकीमला मिळालेले रिक्षा हे चिन्ह बदलायचे नव्हते, फक्त तांत्रिक प्रक्रि या पूर्ण करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करता यावी यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे हितेंद्र ठाकुर यांनी सांगितले.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर