शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिट्टीप्रकरणी ठाकुरांचा विरोधकांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:37 IST

या प्रकरणातील सहभागी असणा-यांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.

पालघर : बविआचे चिन्ह शिट्टी हिसकावून घेण्यात सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारण्यासाठी विमानाचा पास काढून ठेवावा असे सांगून या प्रकरणातील सहभागी असणाºयांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे शिट्टी चिन्ह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गोठविल्याने तीन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला वापरता येणार नसल्याने त्यांना पुन्हा रिक्षा याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची पाळी ओढवुु शकते. या कारणास्तव बविआ पक्षा कडून दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका ही पुन्हा फेटाळून लावण्यात आल्याने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि चिन्ह वाटपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाच्या आत आणि बाहेर कोण-कोण आले, आत गेले, बाहेर गेले, कोणाच्या दबावाखाली काम सुरू होते याबाबतचे पुरावे मिळविण्याचे काम सध्या सुरू असून सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार असल्याचे आ. ठाकुरांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात एवढा नाठाळपणा केला जात असेल तर मग प्रत्यक्ष निवडणुकीत किती करणार असे सत्ताधाºयांच्या हस्तक्षेपाबद्दल सांगून सध्या पुरावे गोळा करतोय नंतर ठोकू असेही त्यांनी सांगितले. मी म्हणजे कुणीही येऊन हाकायला गरीब गाय नसून दूध देणारी मारकुंडी गाय आहे असा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी इथे दिलेले निर्णय कुठल्यातरी मंत्र्यांच्या दबावाखाली दिले मात्र, पुढे कसे देतात ते बघू असा इशाराही त्यांनी दिला. आरडीसीसह अनेकांना दिल्लीचा पास काढून चकरा मारायला तयार रहावे असा इशारा मी दिला असून याना मी अजिबात सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.>तांत्रिक प्रक्रियाच बाकीमला मिळालेले रिक्षा हे चिन्ह बदलायचे नव्हते, फक्त तांत्रिक प्रक्रि या पूर्ण करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करता यावी यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे हितेंद्र ठाकुर यांनी सांगितले.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर