धुळे - धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार शरद पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा सरकार कोसळेल, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल आपल्याला अपेक्षित होता. अमरिश पटेल यांनी धनशक्तीच्या बळावर हा विजय मिळवला आहे, असा आरोप गोटे यांनी केला. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
"महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि..."
By बाळकृष्ण परब | Updated: December 3, 2020 15:54 IST
Sharad Pawar News : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे
महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि...
ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे हे सरकार शरद पवार यांनी आणलं आहेजोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा सरकार कोसळेल