शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

लाज काढणाऱ्यांनी आधी आरशात पाहावे - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:12 IST

आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

मुंबई : आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मांजर डोळे मिटून दूध पिते तसे साठ वर्ष काँग्रेसने देश लुटला. आदर्श, कोळसा, आयपीएल, कॉमनवेल्थपासून अगदी शेण घोटाळाही काँग्रेसवाल्यांनी केला. काँग्रेसचा हा घोटाळेबाज कारभार जनता विसरलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.गोरेगाव येथे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारसभेत उद्धव यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. होर्डिंग लावणाºया आधी आरशात पाहावे. साठ वर्षे सत्तेत राहिलेले आणि माजलेले नेते या पाच वर्षात सुधारतील असे वाटत नाही. सर्व घोटाळ्यांसाठी आधी शरद पवार आणि राहुल गांधी यांची चौकशी व्हायला हवी, असे ठाकरे म्हणाले.शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे वेध लागले आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आधी क्रिकेटपटूंसोबत फोटो असायचे आता शेतकºयांसोेबत दिसतात. देशातील शेतकरी दुष्काळग्रस्त आहेत, याचा पवारांना आता साक्षात्कार झालाय. यांचे सरकार होते तेव्हा या लोकांनी घोटाळा करायला शेणही सोडले नाही, अशी टीका उद्धव यांनी केली.पंतप्रधानपदाची खुर्ची ही काही संगीत खुर्चीचा खेळ नाही. राहुल गांधी आता गरीबी हटावचा नारा देत आहेत. जे त्यांच्या आजीला जमले नाही ते यांना जमणार आहे का, असा सवालही उद्धव यांनी केला. एकट्या नेहरूंमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सावरकर बंधुंनी देशासाठी जिवंतपणी मरण यातना भोगल्या. त्या लोकांनी हे सगळ भोगले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. राहुल गांधी त्याच सावरकरांना डरपोक म्हणतोय. स्वातंत्र्य सैनिकांना डरपोक म्हणून हिणवण्याचा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला, अशा नेत्याच्या हातात तुम्ही देश देणार का, असा सवालही उद्धव यांनी केला.>‘... तर दाऊदला फासावर चढवू’मुंबईत बॉम्बस्फोट घडविणारा दाऊद मुंबईत आला तर त्याला फासावर लटकवायचे काम आपले सरकार करेल. पण, काँग्रेस देशद्रोहाचा खटला चालविणार नाही. ते कलमच त्यांना काढायचे आहे. भारतमातेशी द्रोह करणाºयांवर खटला चालणार नाही, असे बोलणाºया नेत्यांच्या हातात तुम्ही देश देणार आहात का, असा सवालही उद्धव यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना राहुल गांधी यांनी लाथ मारली नसती तर मुंबई काँग्रेस फुटली असती. खरे-खोटे देवरांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई