शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

लाज काढणाऱ्यांनी आधी आरशात पाहावे - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:12 IST

आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

मुंबई : आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मांजर डोळे मिटून दूध पिते तसे साठ वर्ष काँग्रेसने देश लुटला. आदर्श, कोळसा, आयपीएल, कॉमनवेल्थपासून अगदी शेण घोटाळाही काँग्रेसवाल्यांनी केला. काँग्रेसचा हा घोटाळेबाज कारभार जनता विसरलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.गोरेगाव येथे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारसभेत उद्धव यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. होर्डिंग लावणाºया आधी आरशात पाहावे. साठ वर्षे सत्तेत राहिलेले आणि माजलेले नेते या पाच वर्षात सुधारतील असे वाटत नाही. सर्व घोटाळ्यांसाठी आधी शरद पवार आणि राहुल गांधी यांची चौकशी व्हायला हवी, असे ठाकरे म्हणाले.शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे वेध लागले आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आधी क्रिकेटपटूंसोबत फोटो असायचे आता शेतकºयांसोेबत दिसतात. देशातील शेतकरी दुष्काळग्रस्त आहेत, याचा पवारांना आता साक्षात्कार झालाय. यांचे सरकार होते तेव्हा या लोकांनी घोटाळा करायला शेणही सोडले नाही, अशी टीका उद्धव यांनी केली.पंतप्रधानपदाची खुर्ची ही काही संगीत खुर्चीचा खेळ नाही. राहुल गांधी आता गरीबी हटावचा नारा देत आहेत. जे त्यांच्या आजीला जमले नाही ते यांना जमणार आहे का, असा सवालही उद्धव यांनी केला. एकट्या नेहरूंमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सावरकर बंधुंनी देशासाठी जिवंतपणी मरण यातना भोगल्या. त्या लोकांनी हे सगळ भोगले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. राहुल गांधी त्याच सावरकरांना डरपोक म्हणतोय. स्वातंत्र्य सैनिकांना डरपोक म्हणून हिणवण्याचा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला, अशा नेत्याच्या हातात तुम्ही देश देणार का, असा सवालही उद्धव यांनी केला.>‘... तर दाऊदला फासावर चढवू’मुंबईत बॉम्बस्फोट घडविणारा दाऊद मुंबईत आला तर त्याला फासावर लटकवायचे काम आपले सरकार करेल. पण, काँग्रेस देशद्रोहाचा खटला चालविणार नाही. ते कलमच त्यांना काढायचे आहे. भारतमातेशी द्रोह करणाºयांवर खटला चालणार नाही, असे बोलणाºया नेत्यांच्या हातात तुम्ही देश देणार आहात का, असा सवालही उद्धव यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना राहुल गांधी यांनी लाथ मारली नसती तर मुंबई काँग्रेस फुटली असती. खरे-खोटे देवरांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई