शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

"३० वर्षे काँग्रेसची सेवा केली, पण रोजीरोटीची सोय करू शकलो नाही’’, हाताश कार्यकर्त्याची मेसेज पाठवून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:51 IST

Congress Politics News: एकीकडे बड्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी धमासान सुरू असताना पंजाब काँग्रेसमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमधील एका कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना व्हाइस मेसेज पाठवून आत्महत्या केली आहे.

चंदिगड -  पंजाबमध्येकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांची निवड झाली आहे. मात्र पंजाबकाँग्रेसमधील वाद आणि मतभेद अद्याप दूर झालेले नाहीत. एकीकडे बड्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी धमासान सुरू असताना पंजाब काँग्रेसमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमधील एका कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना व्हाइस मेसेज पाठवून आत्महत्या केली आहे. ("Served Congress for 30 years, but couldn't make a living", suicide note sent by Party activist)

दलजीत सिंग जांगपूर उर्फ हॅपी सिंग असे आत्महत्या केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने नवज्योत सिंग सिद्धू यांना एक व्हाईस मेसेज पाठवून आपल्या दुरावस्थेबाबत माहिती दिली होती. दलजीत सिंग हा कार्यकर्ता दाखामधील जांगपूर गावातील रहिवासी होता. दलजीत याने काल विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुमारे १० मिनिटांचा व्हाईस मेसेज पाठवला होता. 

या व्हाईस मेसेजमध्ये दलजीत सिंग म्हणाला की, सिद्धूजी तुम्ही प्रदेशाध्यक्ष बनला आहात. तुम्हाला शुभेच्छा. आता तुम्ही माझ्यासारख्या काँग्रेसची कार्यकर्त्यांचा हात पकडा. माझं सगळं संपल आहे. माझ्याकडील वेळ संपली आहे. मात्र माझ्या कुटुंबाला नक्की साथ द्या. मी जे काम करायला जात आहे, तसे काम हे स्वत:मधील विवेकाला मारून केले जाते. पण अखेर तेच होते जे देवाला मान्य असते.

दलजीत पुढे म्हणतो की, मी काँग्रेसचा खूप जूना कार्यकर्ता आहे. मी यूथ काँग्रेसमध्ये काम केले. राहुल गांधींच्या इलेक्शन कमिशनमध्ये आलो होते. इलेक्शन कमिशननंतर मी अनेक राज्यांमध्ये काम केले. हरियाणामध्ये सुरजेवाला यांच्या प्रदेशात मी काम केले. तत्पूर्वी जेव्हा बिट्टू प्रमुख बनले होते तेव्हा मी त्यांचे प्रतिनिधित्व केले होते. हरियाणा, हिमाचल, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मी काम केले आहे. मी मध्य प्रदेशला तीन वेळा जाऊन आलोय. तिथे मी काँग्रेसचा को-ऑर्डिनेटर म्हणून गेलो होतो. मी गुजरातमध्येही काम केले आहे.

दरम्यान, या मेसेजमध्ये काँग्रेसच्या या कार्यकर्त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचाही उल्लेख केला आहे. मी एका गरीब कुटुंबाशी संबंधित आहे. तसेच जेव्हा मी पंजाबमध्ये परत आलो तेव्हा कुटुंबासाठी अन्नपाण्याचीही व्यवस्था करू शकलो नाही. माझ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात आल्या. मात्र मी पक्षाचा हात सोडला नाही. मात्र पक्षाने माझ्यासाठी काहीच केले नाही. अजूनही मी पक्षासोबतच आहे. प्रधानजी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सांभाळा. असे खूप कमी कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी दिवस रात्र एक केली आहे.

दलजीत पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या सरकारमध्येच माझ्याविरोधात ३०७ चा गुन्हा दाखल कऱण्यात आले. त्यात माझा काही सहभाग नव्हता. मात्र तरीही मला क्लीन चिट मिळालेली नाही. माझ्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत की गेल्या ३० वर्षांत माझे कंबरडे मोडले आहे. जर मी मोलमजुरी केली असती तरी कुटुंबाची परिस्थिती सुधारली असती. मात्र मी माझ्या जीवनातील ३० वर्षे काँग्रेसला दिली. मात्र काँग्रेस माझ्यासाठी अन्नपाण्याचीही व्यवस्था करू शकली नाही.

मी पक्ष सोडू शकत नाही. त्यामुळे हे जग सोडत आहे. माझ्या कुटुंबाला सांभाळा. मी माझा विवाहही केला नाही. माझे संपूर्ण जीवन पक्षाल समर्पित केले. मात्र आज माझ्या पक्षानेच मला हरवले. मात्र असे असले तरी देवाने पुढच्या जन्मातही मला काँग्रेसी म्हणूनच जन्म द्यावा.  

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारण