शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Chiplun Flood: “राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय?” संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:20 IST

Chiplun Flood: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली.

मुंबई: कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हजारो कुटुंबाना बसला आहे. दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी महाड येथील तिळये गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर गेले होते. मात्र, भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबत भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली. (sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari over konkan floods visit) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोकणातील पूरस्थितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महाडनंतर चिपळूण येथील बाजारपेठेला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले आमदार आशीष शेलार होते. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यटघटनेनुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांचे निलंबन झाले आहे. विधिमंडळात आमदारांनी घातलेला गोंधळ आणि केलेली दंगल, तसेच त्यांचे राजदंडाला हात घालणे हे वर्तन घटनाबाह्यच होते आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ राज्यपाल कोश्यारी हे विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत, असे दिसत आहे. विधानसभेचे अस्तित्व आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार जर राज्यपाल मानतच नसतील, तर आता या संदर्भात सरकार काय करते हे पाहावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”

दरम्यान, राज्यपाल भतगसिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारण