शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Sanjay Raut: “निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 11:58 IST

Sanjay Raut: निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (Election 2022) जाहीर केला आहे. यासह प्रचारसभा, कोणत्याही प्रकारच्या रॅलीला बंदी घालण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत तरी समान कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या सभा पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्षांनी घेतल्या. तिसऱ्या लाटेचा जोर दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आकडे भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही. त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही. निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाबरोबर चर्चा केल्याचे म्हटले आहे. पण हा काही उपाय नाही. निवडणुका वेळेत जाहीर केल्या आहेत, पण लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. 

आचारसंहितेच्या बाबतीत समान नागरी कायदा असायला हवा

पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठीक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते. 

गोव्यामध्ये आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण...

गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगprime ministerपंतप्रधान