शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sanjay Raut: “निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 11:58 IST

Sanjay Raut: निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (Election 2022) जाहीर केला आहे. यासह प्रचारसभा, कोणत्याही प्रकारच्या रॅलीला बंदी घालण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत तरी समान कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या सभा पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्षांनी घेतल्या. तिसऱ्या लाटेचा जोर दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आकडे भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही. त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही. निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाबरोबर चर्चा केल्याचे म्हटले आहे. पण हा काही उपाय नाही. निवडणुका वेळेत जाहीर केल्या आहेत, पण लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. 

आचारसंहितेच्या बाबतीत समान नागरी कायदा असायला हवा

पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठीक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते. 

गोव्यामध्ये आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण...

गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगprime ministerपंतप्रधान